काही दिवसांपूर्वी
माझ्या एका दूरच्या नातेवाईकांकडे गेलो होतो. तेंव्हा त्यांनी सांगितले की, ते आजकाल खूप परेशान आहेत कारण त्यांच्या मुलाचे लग्नच होत नाहीयय. खरंतर
त्यांच्या मुलाला चांगला जॉब आहे आणि तो दिसायलाही सुंदर आहे. मी त्यांची ही अडचण
ऐकुण थोडा हैराण झालो. जेंव्हा मी लहान होतो तेंव्हा लोकांना यासाठी परेशान बघितल
होत की, त्यांच्या मुलीचे लग्न होत नाहीयय. तेंव्हा
मुलाचे बाप मात्र ताठ मान करून फिरायचे. मुलींच्या लग्नावर कितीतरी म्हणी बनलेल्या
आहेत. एका काळात असं मानल जायच की, मुलगा म्हणजे जणू
पूढील काळातील चेक आहेत जेंव्हा पाहिजे तेंव्हा वटवा. म्हणजे फायदाच फायदा. मात्र
आता परिस्थिती विपरीत झाली आहे. आता मुलांचे वडिल ही असेच परेशान आहेत जसे मुलींचे
बाप राहत. याला कारण ही तसेच आहे. एकीकडे मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत कमी होत
आहे तर दूसरीकडे मुलींच्या स्थितीत बराच बदल झाला आहे. आता ही गोष्ट राहिली नाही
की, मुलीला विचारल्या शिवाय तिचे हात कुणासोबत ही पिवळे
करावेत. आता त्या शिक्षण आणि आपल्या करिअरला अधिक प्राथमिकता देतात. लग्न ही
त्यांची प्राथमिकता नाही. जर लग्नाचा निर्णय घ्यायचा असेल तर त्या खूप विचारपूर्वक
घेतात.
आता शहरी भागात जातीला एवढेसे
महत्व राहिले नाही. आंतरजातीय विवाह ही आता सामान्य बाब होवून राहिली आहे. अशात
पारंपारिक पध्दतीने लग्न करण्यासाठी ईच्छुक मुलांना वधु मिळण्यात अडचणी निर्माण
होत आहेत. पूर्वी लोक आपल्या जातीतील कमावत्या मुलांची यादी बनवत आणि अशा
मुलांच्या पालकांकडे आपल्या मुलीच्या लग्नाचा प्रस्ताव घेवून जात. अशा वेळी मुलाचा
बाप खूप भाव खायचा. सर्वात अगोदर मोठ्या रक्कमेच्या हुंडयाची मागणी केली जायची
त्यानंतर मुलाचा बाप म्हणेल त्या प्रमाणे थाटामाटात लग्न लावून द्यावे लागे.
मी जेंव्हा लहान होतो तेंव्हा माझ्या समाजातील
मुलाचे लग्न असले की, मला खूप आनंद व्हायचा. मग मी
वरातीत जाण्यासाठी माझा नंबर लागावा यासाठी आईकडे हट्ट करायचो. याला कारण ही तसेच
होते. काही
वर्षांपूर्वी वर पक्षाकडून लग्नाला वरातीत जायचे म्हणजे मोठा थाट-माठ असायचा.
व-हाडी उतरले नाहीत की, वधु पक्षाकडून त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले जायचे. दिवसभर
चहा-पाणी किती ही मागा. व-हाडींपैकी कुणी चहा मागायचे तर कुणी कॉफी तर कुणी दुध, त्यात साखरेचा आणि बिन साखरेचा वेगळा. हे पेय पुरवता-पुरवता वधु पक्षाकडील
सरबराई करणा-यांची दमछाक व्हायची. प्रत्येकाला स्वतंत्ररित्या आंघोळीचा साबण आणि
मेकअपचे साहित्य दिले जायचे. पुरुष व-हाडींची दाढी करण्यासाठी न्हावी हजर असायचा.
कुणी अतीशहाणे व-हाडी आपले कपडे ईस्त्री करून आणण्यासाठी सेवाक-यांच्या अंगावर
फेकायचे. नाश्ता, जेवण या बाबतीत कटाक्षाणे खबरदारी
घेतली जायची. त्यावेळी जरी मला त्यांच्या सरबराई मुळे आनंद होत असला तरी माझ्या
अपरिपक्व मनात एक विचार यायचा तो म्हणजे, हे सगळं
करताना मुलीच्या बापाची किती वाट लागत असेल ? वधू
पक्षाने वर पक्षाचे किती नखरे सहन करावेत ? अर्थात
याचा परिणाम व्हायचा तोच झाला. माझ्या समाजातील सुशिक्षीत लोकांनी सोनोग्राफी
तंत्रज्ञानाचा आधार घेतला आणि मुली जन्माला यायच्या अगोदर पोटातच मारल्या जावू
लागल्या. साहजिकच मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी झाली. फक्त माझ्याच जातीत
नाही तर अनेक जातीत मुलींची संख्या कमी झाली आहे. आज आपल्या मुलाला मुलगी मिळत
नाही म्हणून मुलाचे बाप परेशान आहेत.
सध्या मुलांचे वडिल तुमची मुलगी
द्या म्हणून दारोदार फिरताना दिसतात. यात मुलींना शहरात राहणारा, सुशिक्षीत, करिअर व भरपूर संपत्ती असणारा वर हवा. त्यामुळे ज्या मुलांची घरची आर्थिक
परिस्थिती जेमतेम आहे किंवा ते ग्रामीण भागात राहतात असे स्थळ मुली सरळ-सरळ
नाकारतात. यात ही सर्व काही योग्य असेल आणि जुळण्यासारखी परिस्थिती असेल तर ब-याच
वधू पक्षाकडून वर पक्षाकडे हुंड्याची मागणी केली जात आहे त्याच प्रमाणे लग्न करून
घेण्याची अट टाकली जात आहे. लग्न ही साधेपणाने नाही तर धुमधडाक्यात व्हायला हवे.
एकंदरीत आज अनेक ठिकाणी मुलाचे व-हाड वधू पक्षाकडे जात नाही तर वधुचे व-हाड वर
पक्षाकडे जात आहे व जी सरबराई वधु पक्षाला करावी लागायची ती आता वर पक्षाला करावी
लागत आहे.
एकंदरीत अनेक जातीत आज मुलींसाठी
चांगले दिवस आलेत ही आनंदाची बाब आहे. मात्र सामाजिक प्रश्न जे पूर्वी होते ते
आजही कायम आहेत. आजही लग्नातील तो बडेजाव आणि हुंडा पध्दत कायम आहे फरक एवढाच आहे
की, पूर्वी
मुलीच्या बापाची वाट लागायची आज मुलाच्या बापाची वाट लागत आहे. त्यामुळे या
कुप्रथा बंद झाल्या पाहिजेत. मुलींनी हे समजून घेतले पाहिजे की, आज बदल घडवून आणण्यासाठी एक मोठे शस्त्र त्यांच्या हाती आहे. त्या आपल्या
पित्यावर हुंडा न घेण्यासाठी दबाव आणून ही कुप्रथा कायमची बंद करू शकतात. जर त्या
लग्नासाठी शौचालय असण्याची अट घालू शकतात तर लग्न आर्थिक उधळपट्टी न करता अगदी
साधेपणाने लावून देण्यासाठी ही दबाव आणू शकतात. यासाठी आता मुलींना पूढे आले
पाहिजे अन्यथा बदलत्या काळानूसार कधी मुलाचा बाप त्रस्त असेल तर कधी मुलीचा.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा