मुख्य सामग्रीवर वगळा

धाडसी परंतु ऐतिहासिक निर्णय

 सोमवारचा दिवस ऐतिहासिक ठरला.काश्मीरवरील सर्व अटकळ व शंका संपुष्टात आल्या.मोदी सरकारच्या मिशन काश्मीरचे संपूर्ण चित्र स्पष्ट झाले आहे.राज्यातून कलम ३७० हटविण्यात आले आहे,सोबत जम्मू-काश्मीरला विशेष नागरी दर्जा देणारे कलम- ३५अ रद्द करण्यात आले आहे.गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत ते हटवण्याची शिफारस केली.काश्मीरचे विभाजन करून लडाख व जम्मू हे दोन केंद्रशासित राज्य अस्तीत्वात येणार आहेत.तेथील परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना परत राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन सरकारकडून देण्यात आले आहे.यामुळे संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.दुसरीकडे मतांचे राजकारण करणारे विरोधक,काश्मीरमधील फुटीरतावादी आणि पाकिस्तानचा या निर्णयामुळे तिळपापड झाला असून त्यांच्याकडे स्वत:च्या डोक्याला हात लावून बसण्याशिवाय हाती काहीही राहिले नाही.या निर्णयामुळे काश्मीरच्या सुवर्णयुगाला पुन्हा सुरूवात होईल.
भारत सरकारने राष्ट्रीय सुरक्षेबाबत निश्चितच मोठा निर्णय घेतला आहे.कलम ३५अ मुळे जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा व सुविधा देण्यात आल्या होत्या.हे कलमच आता रद्द करण्यात आल्याने आता आपण तेथे जमीन खरेदी करू शकु आणि आपले तरूण तेथील तरूणींशी विवाह देखील करू शकतील.कलम ३५अ चा आदेश राष्ट्रपतींनी दिला होता त्याला त्याच प्रकारे म्हणजे राष्ट्रपतींद्वारे वटहुकुम काढून दूर केले आहे.मोदी सरकारच्या या निर्णयामुळे काँग्रेस आणि संपूर्ण विरोधकांचा तिळपापड झाला आहे,पण संपूर्ण देश सरकारच्या पाठीशी उभा आहे.काश्मीरमध्ये या निर्णयामुळे कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्यास मदत होणार आहे.गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत  घटनात्मक दुरुस्ती करणारा प्रस्ताव मांडून काश्मिरी फुटीरतावादी नेते आणि विरोधकांच्या पायाखालची वाळू हलवून दिली.आता कलम ३७० चा कलंक कायमचा मिटविला जाईल ही देशासाठी अभिमानाची बाब आहे.तुष्टीकरणाचे धोरण अवलंबून काँग्रेस मतबँकेचे राजकारण करीत राहिली, याचा परिणाम म्हणून संपूर्ण देशाचा विश्वास काँग्रेसने अगोदरच गमावला आहे.
राज्यसभेत गृहराज्यमंत्री अमित शहा यांनी कलम ३५अ रद्द केल्याची माहिती दिल्यानंतर  देशाच्या राजकारणात जणू भुकंप आला आहे,परंतु सरकारला कोणताही धोका निर्माण होणार नाही.कारण सरकारकडे बहुमतापेक्षा जास्त संख्याबळ आहे.त्यामुळे विरोधकांकडे याला विरोध करण्याशिवाय कोणताही मुद्दा नाही.दुसरे म्हणजे, देशातील जनता विरोध करेल असे कोणतेही चुकीचे पाऊल सरकारने उचललेले नाही उलट देशातील जनतेची ईच्छा सरकारने पूर्ण केली आहे. मोदी सरकारच्या या धाडसी निर्णयाने विरोधी पक्षांचे नेते आणि काश्मीर मधील फुटीरतावादयांना वेगळे पाडले आहे.सरकारच्या या निर्णयानंतर फुटीरतावादी आणि दहशतवादयांची सक्रियता देशात आणि जम्मू-काश्मीर मध्ये वाढू शकते.पाकिस्तान सोबत भारत विरोधी इस्लामिक देश भारताला अस्थिर करण्याचा कट रचु शकतात.जागतिक स्तरावर अफवा पसरवल्या जावू शकतात.भारत विरोधी मोहिमेत लागलेले लोक जागतिक स्तरावर एकजुटता दाखवू श्कतात.मात्र हा नविन भारत आहे,तो आता प्रत्येक स्थितिचा सामना करण्यासाठी सक्षम आहे.
काश्मीर मधील कोणत्याही परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी सरकारने संपूर्ण व्यवस्था करून ठेवली आहे.संपूर्ण जम्मू-काश्मीरला सैन्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.नागरिक सुरक्षा आणि सतर्कतेच्या दृष्टीने सर्व आदेश अगोदरच देण्यात आले आहेत.मीडिया आणि बुद्धीजीवी वर्ग अगोदरच ही शंका व्यक्त करत होता कि सरकार काश्मीर बाबत धाडसी निर्णय घेवू शकते.भारत सरकारचे तत्कालीन राष्ट्रपति डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी कलम-३७० अंतर्गत काश्मीर मधील नागरिकांच्या विशेष सुविधेसाठी १४ मे १९५४ मध्ये कलम ३५अ चा एक विशेष आदेश लागू केला होता.१९५६ मध्ये जम्मू-काश्मीरच्या घटनेमध्ये तेथील नागरिकतेची व्याख्या करण्यात आली.त्यानूसार १९५४ च्या पूर्वी हा कायदा लागू होण्याच्या १० वर्षे अगोदर पासून जे लोक काश्मीर मध्ये राहतात ते तेथील नागरिक मानले जातील.राज्याला मिळालेल्या या विशेष दर्जानूसार देशाच्या दूस-या राज्यातील कोणताही व्यक्ति तेथे जमीन खरेदी करू शकत नव्हता,नाही तेथील नागरिकता मिळवू शकत होता.ईतर राज्यातील कोणालाही तिथे सरकारी नौकरी मिळवण्याचा,मतदान करण्याचा अधिकार नव्हता.तेथील शाळांमध्ये दूस-या राज्यातील मुलांना प्रवेश घेता येत नव्हता.तेथील मुलीने जर कोण्या बाहेरील मुलाशी लग्न केले तर तिला तेथील नागरिकता मिळत नव्हती.खरंतर हा कायदा संसदेने केला नव्हता तर हा फक्त राष्ट्रपतींकडून दिलेला विशेष अधिकार होता.ज्याला मोदी सरकार ने साहस दाखवत राष्ट्रपतींद्वारेच संपवून टाकले.निश्चतपणे हा मोठा आणि ऐतिहासिक निर्णय आहे.
लद्दाख वेगळे राज्य निर्माण करून तिथे लोकशाहीचा पाया भक्कम करण्यासाठी प्रयत्न केले जातील.देशाची सुरक्षा लक्षात घेवून सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे.आज कोणताही व्यक्ति सरकारच्या या निर्णयाविरूद्ध उभा नाही फक्त केवळ मतांचे राजकारण करणारे रडताहेत.सरकारच्या या निर्णयाने काश्मीर आता पूर्ण नियंत्रणात येईल.फुटीरतावादी आता आपल्या बिळात लपून बसतील.दहशतवादाचा नाश होईल कारण आता जम्मू-कश्मीर आणि लद्दाख वर केंद्र सरकारचे सरळ नियंत्रण असेल.राज्य सरकार यात कसलाही हस्तक्षेप करू शकणार नाही.काश्मीर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्वाचे राज्य आहे.पाकिस्तान आणि चीनच्या कुटिल नीतिमुळे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने तेथील परिस्थिती अनुकुल नव्हती मात्र सरकारच्या या निर्णयानंतर स्थिती बदलेल आणि या निर्णयानंतर जम्मू-काश्मीरवर केंद्र सरकारचे नियंत्रण असेल.सरकारच्या या निर्णयाने अमेरिकेला सुद्धा तिची जागा दाखवली आहे.अमेरिकेचे राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप काश्मीर मुद्द्यावर मध्यस्थतता करण्याचा राग आवळत होते.भारत सरकारचा हा निर्णय जगाला एक नवा संदेश देण्यात यशस्वी झाला आहे त्याचसोबत पाकिस्तान आणि चीनसाठीही हा कडक संदेश आहे.
मोदी सरकारने काश्मीरचे राजकिय पक्ष,फुटीरतावादी,दहशतवादी आणि पाकिस्तानशी दोन हात करण्याची तयारी केली आहे.जम्मू-काश्मीर मध्ये मोठया प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आले आहे.नागरिक सुरक्षा लक्षात घेवून सर्व सूचना अगोदरच देण्यात आल्या आहेत.भारतीय लोकशाहीसाठी हा खूप खास दिवस आहे.इतिहासाची चूक सुधारत राष्ट्रहितात उचललेले हे पाऊल स्वागत योग्यच आहे.या बाबतीत सरकारची जितकी प्रशंसा करावी कमीच आहे.देशात आता एक स्वच्छ राजकारणाचे युग सुरू झाले आहे.आता लोकशाहीला केवळ सत्तेपर्यंत पोहचण्याचा मार्ग समजणे मोठी चूक होईल.देशाच्या जनतेला जे वाटेल ते सरकारला कोणत्याही अवस्थेत पूर्ण करावेच लागेल.आता तो काळ आला आहे की,फुटीरतावादयांना वंदेमातरम् आणि जयहिंद बोलावे लागेल.जम्मू-काश्मीर मध्ये आता फक्त भारतीय तिरंगा फडकेल.जम्मू-काश्मीरला एक नविन स्वातंत्र्य मिळाले आहे याचे स्वागत  केले पाहिजे.सरकारने फुटीरतावादयांना धडा शिकवायला हवा मात्र तेथील नागरिक अधिकारांच हनन होणार नाही याची विशेष दक्षता घ्यावी लागेल.
-सुरेश मंत्री




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...