मुख्य सामग्रीवर वगळा

नववी ते बारावी लवकरच सेमिस्टर पद्धत

आता लवकरच इयत्ता नववी ते बारावीपर्यंत सेमिस्टर सिस्टिम लागू करण्यात येणार असून नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार (एनईपी) तिसऱ्या वर्गापासून बारावीपर्यंतचा राष्ट्रीय आराखडा (एनसीएफ) तयार झाला आहे. त्याच्या प्रकाशनाची तयारी सुरू झाली आहे. २९ जुलै किंवा त्याच्या आधी एनसीएफ जाहीर होऊ शकतो. सर्व दहा वर्गासाठी नवीन पुस्तके तयार करण्यासाठी विषयतज्ज्ञांची निश्चिती करण्यात आली आहे. एनसीएफ जाहीर होताच पुस्तके तयार करण्यासाठी समित्यांची स्थापना होईल. इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या शालेय शिक्षणात आता १५० विषयांची पुस्तके तयार केली जातील. शैक्षणिक सत्र २०२४-२५ च्या सुरुवातीच्या महिन्यांत नवीन एनईपीनुसार इयत्ता ३ रई, ६ वी आणि नववीची पुस्तके येऊ शकतात. मागील धोरण १९८६ मध्ये आले. पुस्तके २००८ पर्यंत आली. या वेळी २०२० मध्ये धोरण, २ वर्षांत प्री स्कूलची पुस्तके, बारावीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण झाला. केंद्रीय विद्यालयांत बालवाटिका प्री-स्कूल वर्ग सुरू झाले. केव्हीएस- एनव्हीएसच्या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. सीबीएसई शाळांत व गुजरातमध्ये होलिस्टिक प्रोग्रेस कार्डचा पथदर्शी प्रकल्पाची चाचणीदेखील झाली. ६० बोर्डात एकरूपता आणण्यासाठी नॅशनल असेसमेंट सेंटर परख'ची स्थापना झाली. पीएमश्री शाळांतर्गत मॉडेल स्कूल विकसित केले जातील.

माध्यमिक व्होकेशनल एक्सपोजर

सहाव्या वर्गात ११ वर्षांच्या मुलास प्रवेश मिळेल. आठव्या वर्गापर्यंत मुलांना व्होकेशनल एक्सपोजर मिळेल. त्याचे मूल्यांकन होणार नाही. भाषा व विज्ञानव्यतिरिक्त मानव्यशास्त्र, विज्ञान, कला, सामाजिक शाखाचा पायाभूत अभ्यास असेल. आठव्या वर्गाच्या अखेरीस तिसरे मूल्यांकन होईल. तिसरा, पाचवा व आठव्या वर्गातील मूल्यांकन बोर्ड परीक्षेसारखी होणार नाही. नियमित समुपदेशन. व्यावसायिक शिक्षणाचे मूल्यांकन नवव्या वर्गापासून होईल.

जन्मापासून तीन वर्षांपर्यंत : आई-वडिलांसाठीदेखील पहिल्यांदाच अर्ली चाइल्ड केअर एज्युकेशन अभ्यासक्रम (पालनपोषणाबाबत ) तयार झाला आहे.

३ ते ८ वर्षे वयोगटास परीक्षा नाही : बालवाटिका / प्री-स्कूलमध्ये मुलांना जादुई पेटाऱ्यातून ( ५३ प्रकारचे खेळ खेळणी, पोस्टर, बोर्ड, बिल्डिंग ब्लॉक, प्लेइंग (कार्ड) शिकवले जाईल. स्कूल बॅग नसेल. सहा वर्षांच्या मुलास पहिल्या वर्गात प्रवेश मिळेल. त्यात केवळ दोन पुस्तके असतील. भाषा व गणित. दुसऱ्या वर्गानंतर फाउंडेशन लेव्हल पूर्ण होईल.

९ वीचा निकाल दहावीशी जोडणार : नववी ते बारावीपर्यंत सेमिस्टर सिस्टिमने शिक्षण होईल. वर्षात बोर्ड परीक्षेसारख्या दोन संधी मिळतील. नववी-दहावी आणि अकरावी-बारावीमध्ये एकूण १६-१६ पेपर द्यावे लागतील. म्हणजे एक वर्षात किमान ८ पेपर असतील. नववीचा निकाल दहावीच्या अंतिम गुणपत्रिकेत जोडलेला असेल. त्याचप्रमाणे ११ वी मध्ये मिळालेले गुण देखील १२ वी मध्ये जोडले जातील.

९ वी व १० वीत आठ स्ट्रिम : मानव्यशास्त्र-भाषा, गणित, व्यावसायिक शिक्षण, शारीरिक शिक्षण, कला, सामाजिक शाख, विज्ञान, इंटरडिसिप्लिनरी ग्रुप. या ८ समूहात प्रत्येकातून दोन म्हणजे १६ पेपर निवडावे लागतील. या आठ गटांतून किमान तीन समूहातील चार विषय निवडावे लागतील.

आता शाखांचे विभाजन नसेल : संगीत, क्रीडा, क्राफ्टला कला शिक्षण, शारीरिक शिक्षण तसेच व्यावसायिक शिक्षणाचा दर्जा गणित, विज्ञान, मानव्य, भाषा व सामाजिक विज्ञानासारखाच असेल. रिपोर्ट कार्डऐवजी हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड असे म्हटले जाईल.

नववी ते बारावीची परीक्षा सेमिस्टर पद्धतीने होणार असल्याने दहावी आणि बारावीची बोर्डाची परीक्षा नसेल असा गैरसमज लोकांनी करून घेतला आहे. परंतु असं नसून या धोरणामध्ये बोर्डाच्या कार्यपद्धतीबाबत उल्लेख आहे. जरी परीक्षा या सेमिस्टर पॅटर्नमध्ये झाल्या तरीही बोर्डाच्या अखत्यारितच या परीक्षा होतील.

-सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...