मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

संपत्ती कमवा पण ......

या जगात प्रत्येक जण रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हातानेच परत जातो हे त्रिकाल बाधित सत्य माहित असूनही आज प्रत्येक जण पैश्याच्या मागे धावताना दिसतोय. प्रत्येकाला संपत्तीचा संचय करण्याचा हव्यास आहेच. संत कबीरदास यांनी म्हटले आहे - साई इतना दीजीये , जामे कुटुम समाय , मै भी भुखा ना रहुं , साधु न भुखा जाय. पैशाच्या मागे धावत-धावत जीवनाचा खरा आनंदच हरवून बसलो आहोत आपण. संपत्ती संचयासाठी आपण माणूसकी सुद्धा विसरत चाललो आहोत. मला लहानपणापासून ऐकलेली एक गोष्ट आठवते. एक माणूस सारखा देवाला तक्रार करत असतो की , देवा तू मला काहीच दिले नाहीस. देवाने त्रस्त होवून त्याला वरदान दिले की , तू २४ तासात जेवढे अंतर पायी कापशील तेवढी जमीन तुझी होईल. तो माणूस हव्यासापोटी पळत राहिला , पळत राहिला आणि मेला. आज आपली सुद्धा स्थिती अशीच आहे. संपत्ती संचय करण्यासाठी सर्व जण पळताहेत आणि शेवटी काय तर शून्य. संपतीमुळे सुख मिळत ही जर आपली कल्पना असेल तर ती भ्रामक आहे. अमाप संपत्ती असणा-यांनी आत्महत्या करून मृत्यूला कवटाळल आहे याची अनेक ताजी उदाहरण आहेत. आपण संपती का कमावत आहोत , कशासाठी कमावत आहोत हे कुणा...

…. म्हणून पीएचडीवाला चपराशी होतोय ļ

उ त्तरप्रदेशच्या पोलीस विभागात चतुर्थ श्रेणी संदेशवाहक म्हणजे चपराशी पदाच्या ६२ रिकत जागांसाठी नुकतीच जाहिरात देण्यात आल्यानंतर ९३ हजार लोकांनी या पदासाठी अर्ज केले.या आकडयावरून देशातील बेरोजगारी किती वाढली आहे हे दिसून येते.या ठिकाणी नमूद करण्याची विशेष बाब म्हणजे या मुठ्ठीभर जागांसाठी अर्ज करणा-यात ५० हजार पदवीधर , २८ हजार उच्च पदवीधर आणि ३७०० पीएचडी धारक आहेत.या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता फक्त पाचवी उतीर्ण आहे मात्र अर्ज करणा-यात पाचवी ते बारावी पास उमेदवारांची संख्या ९३ हजारांमधून केवळ ७४०० आहे.अर्जाची ही आकडेवारी अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण करते.अस असू शकत की या ९३ हजार उमेदवारांपैकी सगळेच बेरोजगार नाहीत.यापैकी काही जण अपेक्षीत वेतन मिळणा-या खाजगी क्षेत्रातील पदावर काम करणारे असे शकतात.युवकांमध्ये खाजगी क्षेत्रातील नौकरीपेक्षा सरकारी नौकरीला प्राधान्य देण्याची मानसिकता सध्या जास्त असल्यामुळे त्यांनी सुद्धा अर्ज केले असतील तरीसुद्धा यावरून देशातील बेरोजगारी वाढत चालली आहे हे नाकारून चालणार नाही. आपण आता हे लक्षात घेतल पाहिजे की सरकारी नौक-या आता खूप कमी प्रमाणात उपलब्ध ...

समलैंगिकांना समाज स्विकारेल?

२०१८ चा ६ सप्टेंबर हा दिवस इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहायला पाहिजे. यासाठी नाही की , या दिवशी सवर्णांनी एससी/एसटी कायदयाच्या विरोधात भारत बंद केला होता. सर्वोच्च न्यायालयाने मार्च महिन्यातच सांगितले होते की , अनुसुचित जाती आणि जमातीच्या अत्याचार निवारण कायद्याअंतर्गत होणा-या गुन्हयात आरोपीला वरिष्ठ पोलीस अधिका-याच्या परवानगी वा प्राथमिक तपासानंतरच अटक करता येईल मात्र संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने वटहुकुम आणला आणि अगोदरच कायदा निश्चित केला. सवर्णांना हा अन्याय वाटल्याने सरकारच्या या वटहुकुमाच्या विरोधात भारत बंद होता. या दिवशी एकीकडे भारत बंद होता तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिकांना समाजाची दारे उघडून दिली. अशा समाजाची ज्यात याच समाजाचा एक हिस्सा गुलाम बनून राहिला होता. नव्हे तो समाजाचा भागच नव्हता.समाजाने यांना तर कधी आपल मानलच नव्हत. समाजाला वाटत की हे निसर्गाच्या विरोधात आहे. म्हणून त्यांनी स्वत:ला लपवून ठेवले पाहिजे. यांना तर तो समाज पाहिजे ज्यात बलात्कारी , खुनी , लुटमार करणारे आणि दुस-यांचा हक्क हिरावून घेणारी सन्मानीत पुरुष आहेत जी उच्च पदावर बस...

आरक्षणासाठी आंदोलनं

आ ज भारतात क्वचितच कोणती जात असेल जिने आरक्षणासाठी मागणी केलेली नाही. महाराष्ट्रात मराठा आंदोलना सोबत धनगर समाजाने आरक्षणासाठी जोर धरला आहे. नुकतीच मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मराठा क्रांती मोर्चाने १ नोव्हेंबरपर्यंत आरक्षण न दिल्यास १ डिसेंबरपासून परत आंदोलन तिव्र करण्याचा इशारा नुकताच दिला आहे. पंजाब मध्ये जाट समाजाची आरक्षणासाठी जेंव्हा-तेंव्हा आंदोलन सुरूच असतात. आंध्रप्रदेश मध्ये कापू सुद्धा आंदोलन करत आहेत. मतं कमी होण्याच्या भितीने जी ती सरकारं आरक्षणाची मागणी मान्य करतात मात्र नंतर न्यायालयं त्यावर स्थगिती आणतात. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही हेच घडल. राजकिय पक्षात ही हिम्मत नाही की , ती ख-याला खरं आणि खोटयाला खोटं म्हणू शकतील यामुळेच आरक्षणाचा तिढा न सुटता अधिकच गंभीर बनत चालला आहे. आरक्षणाच्या बाहेर असलेल्या जातींना आजही वाटते की , त्यांचा उद्धार आरक्षण मिळाल्यानेच होईल जेंव्हाकी सरकारी नौक-या मात्र नावालाच उरल्या आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी खरे म्हटले होते की , सरकारी नौक-या आता राहिल्यात कुठे ? ८० टक्के न...

इंटरनेटच्या बाहेर सुद्धा जीवन आहे !

  आ ता  वयस्क काय आणि लहान मुले काय सगळ्यांच्या जीवनातील मोठा वेळ आता इंटरनेटवर जात आहे. आपण सोशल मीडियावर केलेल्या एखाद्या पोस्टला मिळालेल्या भरपूर लाईक्स बघून एवढे खुश होतो की जणू आपल्याएवढा जगात कोणी आनंदी नाही याविपरीत जर कमी लाईक्स मिळाल्या तर आपण एवढे नाराज होतो की जणू आपल्यावर प्रेम करणारा या जगात कोणीच नाही. हे इंटरनेटचे अती प्रेम आता एका मानसिक आजारामध्ये रूपांतरीत होत आहे. आपण आपल्या वास्तविक जीवनात आनंदी राहण्याऐवजी इंटरनेटच्या आभासी जगात आनंद शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्या आसपास लाखो गेगा बाइट्स माहिती सतत येत आहे. व्हाट्सअ‍ॅपवर तर दिवसाला हजारो मेसेज येवून धडकतात. यापैकी कोणती माहिती खरच माझ्यासाठी आहे आणि कोणती नाही आपण हे निश्चितच करू शकत नाहीत. आपण हेही निश्चित करू शकत नाहीत की , यासूचनांपैकी किती सूचनांना आपल्या जीवनात महत्व द्यायचे आहे. लहान-सहान कामासाठी आपण ते अधिकच सोपे जावे म्हणून जसे अवजारं काढायचो तस आज छोट्या-छोट्या गोष्टीसाठी इंटरनेटवर जातो यातून जीही माहिती मिळते त्या माहितीला आपण ब्रम्हवाक्य मानायला लागतो. आपल्या पोटात सतत वेदना होत आहेत...

कशासाठी?भाकरीसाठी....

आ पण सर्वांची धडपड ही दोन वेळची भाकर मिळवण्यासाठी चालू असते. ही भाकर मिळवण्यासाठी एखादा व्यवसाय , नौकरी करावी लागते किंवा रोजगार मिळवावा लागतो. अर्थातच ही सोय आपल्या गावातच होते असे नाही त्यामुळे आपले पोट भरण्यासोबतच जीवनमान उंचावण्यासाठी मला किंवा आपल्यापैकी अनेकांना आपल घर , गाव , शहरच नाही तर देश सुद्धा सोडावा लागला आहे. हि परिस्थिती केवळ आजची नाही तर मानव विकासाच्या प्रक्रियेत ही यात्रा सतत सुरू आहे.               पोटासाठी लोक हसत-हसत विस्थापितांच जीवन निवडतात अस म्हटल्यास वावग ठरणार नाही. माझे चुलते , भाऊ आणि अनेक स्वकियांनी भाकरीच्या शोधात आपल घर सोडल , त्यांचा निवासाचा पत्ता बदलला आणि जो जिथ गेला तिथलाच होवून राहिला तोही कायमचाच. ही वास्तविकता मानवी गरज आणि विकासाचा अभिन्न अंग झाली आहे. या गोष्टीला कोणीच नाकारणारही नाही. भाकरीचा शोध ही अशी बाब आहे ज्याला कोणी दूर्लक्षित करू शकत नाही. ही भाकर कुठे मिळेल याचा अंदाज सूरूवातीला कोणीच करू शकत नाही. हे काळच निश्चित करतो की आपल्याला कोठे जावे लागेल.आपला जन्म कुठे...

आता इंटरनेट अडिक्शनची भीती

ल वकरच  भारतामध्ये ५ जी इंटरनेट सुविधा सुरू करण्यासाठी हालचाली होत असल्याचे वृत्त आले आहे. भारतात इंटरनेटचा प्रसार झपाटयाने होत आहे. प्रतीदिन १.५ जीबी इंटरनेट सुविधा अत्यल्प दरात भेटत असल्याने भारतीय तरूणांना बेरोजगारीची जाणिव होत नसल्याचे मागे कुठेतरी माझ्या वाचनात आले होते. ही बाब वास्तविकतेपासून तरूणांना दूर करणारी आणि गंभीर आहे. भारतीय तरूणांमध्ये एकीकडे बेरोजगारी वाढत चालली आहे तर दूसरीकडे मोठया संख्येने तरूण इंटरनेट अडिक्शनकडे वाटचाल करित आहेत. सध्या देशाची एक मोठी संख्या स्मार्टफोन , इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या साइबर अडिक्शनची शिकार झाली आहे. यामुळे युवकात बेरोजगारी तसेच देशाच्या वास्तविक समस्यांच्या प्रती विचार करण्याची आणि त्यांना समजून घेण्याची क्षमता संपत आहे. इंटरनेट अडिक्शने केवळ भारतच नाही तर जगातील अनेक देश आता त्रस्त झाले आहेत. नुकतेच कैंब्रीज एनालिटिका कंपनीने फेसबुक वरिल डेटा लीक करून याचा वापर डोनाल्ड ट्रंप यांना विजयी करण्यासाठी केल्याची बाब समोर आली. तरूणांमधील इंटरनेट अडिक्शनचाच फायदा या कंपनीने घेतला.तरूणांचे व्यक्तीगत आकडे आता एखादया व्यक्तीला अथवा क...