मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सरकारला नीति बदलाची गरज

मागील चार वर्षात भाजपाने गाय आणि राम मंदिर मुद्द्यांच्या आधारे हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला सोबत त्यांनी विकसित देशांप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था वाढवण्याचा प्रयत्न केला.मेक-इन-इंडिया , बुलेट ट्रेन या संकल्पना याचाच भाग होत्या.विकसित देशांचे अनुकरण करतानाच अगोदर नोटाबंदी आणि त्यानंतर जीएसटी लागू करण्यात आली जेणेकरून विकसित देशांप्रमाणे डिजीटल अर्थव्यवस्था स्थापित होईल मात्र सरकारची ही पाऊलं खास करून तिच्यासाठी हानीकारक ठरली आहेत.नोटाबंदी आणि जीएसटीने लहान उद्योगांना उद्धवस्त केले आहे.या लहान उद्योगांमुळेच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत होता त्यामुळे रोजगारात कमतरता निर्माण झाली आहे.रोजगारात कमी आल्याने सामान्य माणसाच्या क्रय शक्तीचा –हास झाला आहे त्यामुळे बाजारपेठेत एक प्रकारचे मंदीचे सावट आले आहे.या कारणांमुळेच अर्थव्यवस्थेचा विकास दर पूर्ववत ७ वर टिकून आहे.   गरीबाने जर श्रीमंत माणसाप्रमाणे १०० रुपयांची एक कप चहा पिली तर त्याच महिन्याच बजेट बिघडून जात काहीस असच भारताद्वारे विकसित देशांची नीति लागू केल्याने भारताची अर्थव्यवस्था बिघडली आहे.वर्तमान भाजपा ...

यंत्र आणि मानव

हे सर्व तर ठिक आहे पण तु नेमक काय काम करतोस ? मुलीचे वडिल आपल्या मुलीच्या मित्राला विचारत आहेत.त्यांच्या प्रश्नात शक्यतेच्या शोधासोबत मोठ्या प्रमाणावर सांशकता आहे.सर्जनशिलता तर ठिक आहे मात्र यात पैसा कुठे आहेत ? हे दृश्य आजचे नाही तर भावी काळाचे आहे कारण त्या काळात सर्जनशिलता माणसाची नाही तर दुस-याच कुणाची तरी होवून जाईल.आज यंत्र मानवी जीवनाचा अविभाज्य अंग होवून राहिली आहेत.या यंत्रांमुळेच मी-आपण एवढे बदलले आहोत की हे दृश्य जर एखादा १५ व्या शतकापूर्वीच्या मानवाने बघितले असते तर तो हे बघून बेशुद्ध झाला असता किंवा आपल्या डोळ्यावरच विश्वास ठेवू शकला नसता.आपल जीवन यंत्रांच्या साह्याने अधिक सुखकारक करण्याच्या प्रयत्नात आज मानवाचीच यंत्र बनण्याची वेळ आली आहे एवढच नाही तर भविष्यात त्याच अस्तित्वच धोक्यात येणार आहे. यंत्रांचा पहिला संबंध माणसाच्या बेरोजगारीशी आहे.यंत्र आली , त्यांनी मानवाच्या पेक्षाही अधिक कुशलतेने आणि वेगाने कामे केली तर माणस कुठ जातील ? ती आपल पोट कस भरतील ? त्यांच्या कुटुंबाच काय होईल ? हा प्रश्न जवळपास २०० वर्षांपूर्वी मानवाला पडला होता.हा प्रश्न आणि त्याला जोडून अ...

मित्रहिनता

एकदा मी आणि माझ्या सहका-याची चर्चा सुरू होती.गोष्ट या मुद्द्यावर येवून थांबली होती की,कोण खरा मित्र असतो आणि कोण नाही ?मी त्याला विचारले,तुझा कोण विश्वासू मित्र आहे?त्याने तात्काळ उत्तर दिले,अनेक आहेत.मी त्याला चार नावे सांगावयास सांगितले.बराच वेळ विचार केल्यानंतर त्याने कसेबसे एकच नाव सांगितले.मला असे वाटले की,त्याने हे ही नाव लाजून सांगितले कारण त्याला भीती होती की,तुझा तर एकही खरा मित्र नाही असे मी म्हणेल.             चर्चा पूढे चालू राहिल्यानंतर त्याने मला विचारले की,खरा मित्र कोण असतो?मी त्याला सांगितले की,आपण संकटात असताना सर्वप्रथम ज्याचे नाव आपल्याला आठवते तोच आपला खरा मित्र.मजेची गोष्ट अशी की,कित्येक वेळा ती ही व्यक्ती असते जिला आपण आपला शत्रू समजत असतो.मात्र आपण या ख-या मित्रासोबत ना जास्त हसत-बोलत असतो ना सोबत फिरत असतो.त्याच्या सोबत आपण कमीत-कमी वेळ घालवत असतो.हे ऐकल्यानंतर तो माझ्याकडे बघतच राहिला जणू मी त्याच्या मनातील गोष्ट सांगितली आहे. इंटरनेट मुळ जग जवळ आल आहे मात्र माणस दूरावत चालली आहेत.या गर्दीतही माणुस एकटा फिरत आहे.प्रत्येकाला एक...

शाळेतील वर्गही वाटू लागले हिंदू-मुसलमानात

नुकतच एका शाळेतील हिंदू-मुसलमान विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या वर्गात वाटल्याचे प्रकरण समोर आले आहे.उत्तर दिल्लीच्या महानगर पालिकेची ही शाळा आहे वजीराबाद गावातील.या शाळेतील पहिली वर्गाच्या अ तुकडीत ३६ हिंदू आहेत तर ब तुकडीत ३६ मुसलमान.दूसरीच्या अ तुकडीत ४७ हिंदू , ब तुकडीत २६ मुसलमान आणि १५ हिंदू तर क तुकडीत ४० मुसलमान. तीसरीच्या अ वर्गात ४० हिंदू , ब तुकडीत २३ हिंदू आणि ११ मुसलमान , क तुकडीत ४० मुसलमान तर ड तुकडीत १४ हिंदू आणि २३ मुसलमान.चौथीच्या अ तुकडीत ४० हिंदू , ब तुकडीत १९ हिंदू आणि १३ मुसलमान आणि क तुकडीत ३५ मुसलमान.पाचवीच्या अ तुकडीत ४५ हिंदू , ब तुकडीत ४९ हिंदू , क तुकडीत ३९ मुसलमान आणि २ हिंदू तर ड तुकडीत ४७ मुसलमान.शाळांचे काम असते मुलांमध्ये सर्वधर्म समभाव आणि सामाजिक ऐक्याची भावना वाढीस लावणे.शाळांमध्येच असे प्रकार घडू लागले तर भारताचे भवितव्य काय असेल ?             शाळेमध्ये विद्यार्थी तुकड्यांमध्ये विभागले जातात ही मान्यताप्राप्त प्रक्रिया आहे आणि ती सगळ्या शाळांमध्ये राबविली जाते मात्र एकाच वर्गातील विद्यार्थ्यांच...

ऐतिहासिक! स्वातंत्र्याच्या दिशेने एक पाऊल

सर्वोच्च न्यायालयाने अगोदर स्त्रीला वारसा हक्क देवून तिला लैंगिक बरोबरीचा अधिकार प्राप्त करून दिला होता.आता नुकतेच सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यांच्या खंडपीठाने घटनेचे १५८ वर्ष जूने ४९७ कलम रद्द करून तिला लैंगिक स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा करून दिला आहे.सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर समाज माध्यमातून या बाबतीत उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या.अगोदरच स्त्रीच्या बाबतीत संकुचीत भावना असणा-या समाजाने स्त्री आणि पुरुष यांचे विवाहबाहय संबंध हा आता गुन्हा ठरणार नाही म्हणून अनैतीक संबंधाला खुली परवानगी एवढाच घेतला आहे मात्र न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे स्त्री स्वातंत्र्याच्या दिशेने टाकलेले आणखीन एक पाऊल आहे.निश्चितच हा ऐतिहासिक निर्णय आहे. न्यायालयाच्या हा निर्णय देताना स्पष्ट केले आहे की,देह ही स्त्रीची संपत्ती आहे आणि त्याबद्द्ल निर्णय घेण्याचा अधिकार तिला आहे.भारतीय दंड संहितेचे कलम ४९७ महिलेच्या सन्मानाच्या विरोधात आहे.महिलांचा नेहमीच सन्मान करायला हवा.महिलांना समाजाच्या इच्छेनूसार विचार करण्यास सांगता येवू शकत नाही.संसदेनेही महिलांवरिल अत्याचार रोखण्यासाठी कौटुंबीक हिंसाचार व...

संपत्ती कमवा पण ......

या जगात प्रत्येक जण रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हातानेच परत जातो हे त्रिकाल बाधित सत्य माहित असूनही आज प्रत्येक जण पैश्याच्या मागे धावताना दिसतोय. प्रत्येकाला संपत्तीचा संचय करण्याचा हव्यास आहेच. संत कबीरदास यांनी म्हटले आहे - साई इतना दीजीये , जामे कुटुम समाय , मै भी भुखा ना रहुं , साधु न भुखा जाय. पैशाच्या मागे धावत-धावत जीवनाचा खरा आनंदच हरवून बसलो आहोत आपण. संपत्ती संचयासाठी आपण माणूसकी सुद्धा विसरत चाललो आहोत. मला लहानपणापासून ऐकलेली एक गोष्ट आठवते. एक माणूस सारखा देवाला तक्रार करत असतो की , देवा तू मला काहीच दिले नाहीस. देवाने त्रस्त होवून त्याला वरदान दिले की , तू २४ तासात जेवढे अंतर पायी कापशील तेवढी जमीन तुझी होईल. तो माणूस हव्यासापोटी पळत राहिला , पळत राहिला आणि मेला. आज आपली सुद्धा स्थिती अशीच आहे. संपत्ती संचय करण्यासाठी सर्व जण पळताहेत आणि शेवटी काय तर शून्य. संपतीमुळे सुख मिळत ही जर आपली कल्पना असेल तर ती भ्रामक आहे. अमाप संपत्ती असणा-यांनी आत्महत्या करून मृत्यूला कवटाळल आहे याची अनेक ताजी उदाहरण आहेत. आपण संपती का कमावत आहोत , कशासाठी कमावत आहोत हे कुणा...

…. म्हणून पीएचडीवाला चपराशी होतोय ļ

उ त्तरप्रदेशच्या पोलीस विभागात चतुर्थ श्रेणी संदेशवाहक म्हणजे चपराशी पदाच्या ६२ रिकत जागांसाठी नुकतीच जाहिरात देण्यात आल्यानंतर ९३ हजार लोकांनी या पदासाठी अर्ज केले.या आकडयावरून देशातील बेरोजगारी किती वाढली आहे हे दिसून येते.या ठिकाणी नमूद करण्याची विशेष बाब म्हणजे या मुठ्ठीभर जागांसाठी अर्ज करणा-यात ५० हजार पदवीधर , २८ हजार उच्च पदवीधर आणि ३७०० पीएचडी धारक आहेत.या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता फक्त पाचवी उतीर्ण आहे मात्र अर्ज करणा-यात पाचवी ते बारावी पास उमेदवारांची संख्या ९३ हजारांमधून केवळ ७४०० आहे.अर्जाची ही आकडेवारी अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण करते.अस असू शकत की या ९३ हजार उमेदवारांपैकी सगळेच बेरोजगार नाहीत.यापैकी काही जण अपेक्षीत वेतन मिळणा-या खाजगी क्षेत्रातील पदावर काम करणारे असे शकतात.युवकांमध्ये खाजगी क्षेत्रातील नौकरीपेक्षा सरकारी नौकरीला प्राधान्य देण्याची मानसिकता सध्या जास्त असल्यामुळे त्यांनी सुद्धा अर्ज केले असतील तरीसुद्धा यावरून देशातील बेरोजगारी वाढत चालली आहे हे नाकारून चालणार नाही. आपण आता हे लक्षात घेतल पाहिजे की सरकारी नौक-या आता खूप कमी प्रमाणात उपलब्ध ...