मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

पोटनिवडणूकांवर सरकारचे भवितव्य

बिहार विधानसभा निवडणूका बरोबरच ११ राज्यांच्या ५६ जागांसाठी पोटनिवडणूका होणार आहेत. या पोटनिवडणूकांचे खास महत्व असल्याने याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. विशेषकरून मध्यप्रदेश, गुजरात आणि उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणूकांचे निकाल अर्थपूर्ण राहतील.      मध्यप्रदेश मध्ये २८ जागांसाठी मतदान होणार आहे. याच्या निकालांवर तेथील सरकारची स्थिरता अवलंबून असेल. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि कमलनाथ यांचे राजकिय भवितव्य या निकालांवर अवलंबून असेल. जर या जागांचे समिकरण बघितले तर यापैकी अधिकाधिक जागा अशा आहेत जिथे २०१८ मध्ये भाजपाच्या राज्यस्तरिय प्रबळ नेत्यांचा पराभव करून काँग्रेसचे उमेदवार जिंकले होते. मात्र हेच काँग्रेसचे उमेदवार या पोटनिवडणूकीत भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात असतील कारण ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या सोबत त्यांनीही पक्षांतर केले आहे. पक्षांतर करणा-या सर्व काँग्रेसी नेत्यांना भाजपाकडून जर तिकिट देण्यात आलं तर भाजपाच्या जुन्या नेत्यांकडून बंडखोरीचे संकट भाजपासमोर निर्माण होवू शकत. पक्षामध्ये या मुद्दयावर विचारमंथन सुरू आहे. भाजपाच्या नेत्यांचा एक वर्ग असा आहे ज्यां...

कोरोना: बेरोजगारी आणि उपासमारीचे आव्हान

भा रत आता द्विधा अवस्थेत आहे. एकीकडे अनलॉक प्रक्रीयेअंतर्गत रेल्वे, मेट्रो, हवाई वाहतूक, कार्यालये, बाजार आणि कंपन्या सर्व काही सुरू झाले आहेत तर दूसरीकडे कोरोनाची महामारी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. स्वत: भारताची महामारीपासून महत्तम महामारीकडे घोडदौड सुरू आहे. या घोडदौडीत त्याने जगातील अधिकतर देशांवर मात केली आहे. एक काय तो अमेरिका पूढे आहे. ब्राझील आणि भारतात कोरोना संक्रमित रूग्णांचा आकडा ४१ लाखांच्या जवळपास बरोबरीत पहुंचला, नंतर मात्र भारताची बुलेट ट्रेन एवढी सुसाट धावू लागली की, ब्राझील खूप मागे पडला. रूग्ण वाढीचा हा वेग असाच राहिला तर भारत लवकरच अमेरिकेलाही मागे टाकेल. सध्या भारतात दररोज कोरोनाने संक्रमित होणा-या रूग्णांची संख्या एक लाखाच्या जवळपास आहे. यात शंका नाही की या महामारीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारं जीव तोडून प्रयत्न करित आहेत. दररोज १० लाखाच्या आसपास कोरोना चाचण्या घेतल्या जात आहेत. आत्तापर्यंत जवळपास ५ कोटी लोकांची तपासणी करण्यात आली आहे मात्र १३५ कोटी लोकसंख्या असलेल्या या देशात तपासणीचा वेग असाच राहिला तर सर्वांची तपासणी करण्यात वर्षे लागतील...

काँग्रेसला मजबुत नेतृत्वाची गरज

काँ ग्रेसच्या महत्वपूर्ण २३ नेत्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना एक विशेष संयुक्त पत्र लिहून पक्ष संघटनेच्या विविध समित्यांच्या निवडणूका घेऊन निवडणूकीद्वारे पक्षाचा अध्यक्ष निवडण्याची मागणी केल्याची अभूतपूर्व घटना मागच्या सप्ताहात घडली. यावर राहुल गांधी यांनी तिव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. या २३ जणांच्या मागणीला बंडखोरी ठरवून या नेत्यांचे पक्षातुन खच्चीकरण करून त्यांचे राजकारण अप्रत्यक्षरित्या संपविल्या जाण्याची शक्यता जास्त आहे. मागील दोन लोकसभा निवडणूकींचा निकाल पाहिला असता काँग्रेसची मोठया प्रमाणात घसरण झाली आहे. काँग्रेस मध्ये पक्ष नेतृत्वाची सुत्रे काही अपवाद सोडता नेहमी गांधी घराण्याच्या भोवती फिरत आली आहेत. काँग्रेसला नवसंजिवनी द्यायची असेल तर आत्ता मात्र मजबुत नेतृत्वाची गरज आहे. प्रादेशिक पक्षांचे तसं बर आहे. यांच्यात अध्यक्षाला घेवून भांडणे होत नाहीत. ज्याचा पक्ष तोच अध्यक्ष. पक्ष सुद्धा तो बनवतो ज्याच्याकडे वोट बँक आहे. प्रादेशिक पक्षांमध्ये नेतृत्वावरून भांडण झाल तर हा वाद कौटुंबिकच असतो तोही तेंव्हा जेंव्हा  राजकिय वारसा सांभाळण्याचा प्रश्न निर्म...

कमला हॅरिस यांची उमेदवारी ट्रंपसाठी डोकेदुखी

  अ मेरिकेत डेमोक्रेटिक पक्षाकडून भारतीय वंशाच्या कमलादेवी हॅरिस यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्यात आली आहे ही एक ऐतिहासिक घटना आहे. जर आपण असं मानून चाललो की,नोव्हेंबर मध्ये होणा-या राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत बाइडन आणि कमला हॅरिस विजयी होतीलच आणि जर डेमोक्रेटिक पक्षाचे हे दोन्ही उमेदवार जिंकले तर अमेरिकेच्या अंतर्गत राजकारणात आणि तिच्या विदेशी धोरणात गंभीर परिवर्तन होण्याची शक्यता प्रबळ होईल. डेमोक्रेटिक पक्ष जर ही निवडणूक जिंकला तर कमला हॅरिस अमेरिकेच्या पहिल्या कृष्णवर्णिय महिला उपराष्ट्रपती बनतील. अमेरिकेच्या इतिहासात आत्तापर्यंत महिला मंत्री तर बनल्या आहेत मात्र उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणा-या महिला उमेदवार आत्तापर्यंत कधीच जिंकलेल्या नाहीत. हिलरी क्लिंटन अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्रपती जवळपास झाल्याच होत्या. त्यांना डोनाल्ड ट्रंप यांच्यापेक्षा अडीचेक लाख मतं जास्त मिळाली होती. पण इलेक्टोरल मतांमध्ये त्या हरल्या. जगात इतरत्र जे घडतय आणि घडू घातलय याची रंगीत तालीम अमेरिकेत होतेय. अमेरिका हा देश कोणाचा आहे आणि तो कोणी चालवायचा, असं कमला हॅरिस विचारत आहेत. जर कम...

'सर्जा-राजा' च्या सणावर कोरोनाचे सावट

  श्रा वण महिन्यात सणांची रेलचेल पहायला मिळते.अनेक सण या महिन्यात आपल्या भेटीला येतात. पावसाळ्याचे दिवस असल्याने सृष्टी आधीच हिरवाईचा शालु नेसुन नवीकोरी झालेली असते. संपुर्ण वातावरणात एक गारवा पसरल्याने मानवी मन देखील ताजं तवानं झालेलं असतं. अशा या श्रावण महिन्यात आपण नागपंचमी,नारळी पौर्णिमा,रक्षाबंधन,गोकुळाष्टमी यांसारखे सण साजरे करतो आणि या सणांबरोबरच सरत्या श्रावणात पिठोरी अमावास्या येते आणि संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो तो सर्जा-राजाचा सण म्हणजे 'पोळा'. गेल्यावर्षी हा सण महाराष्ट्रातील बहुतांश भागावर दुष्काळाचे सावट असल्याने काहीसा कमी उत्साहात साजरा करण्यात आला होता. यावर्षी आत्तापर्यंत चांगला पाऊस होवूनही कोरोना महामारीमुळे साथ प्रतिबंधक नियंत्रण कायद्याअंतर्गत ३१ अॉगस्ट पर्यंत लॉकडाऊन असल्याने सार्वजनिक  सण-उत्सव साजरा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडले असुन ईच्छा असुनही वर्षभर राबणाऱ्या आपल्या बैलांना सजवुन त्यांची मिरवणुक काढता येणार नाही याची हुरहुर शेतकऱ्यांना लागली आहे. त्यामुळे हा सण केवळ औपचारिकता म्हणून साजरा होण्य...

युद्ध आमुचे सुरूच

या शतकातील सर्वात मोठया आव्हानाचा सामना सध्या भारत करत आहे. हे आव्हान आहे कोरोना महामारीचे. भारतात कोरोना रूग्णांची संख्या १९ लाखाच्या आसपास गेली आहे आणि ३९ हजार मृत्यू झाले आहेत. कोरोनाचा आलेख ज्या प्रमाणात वाढत आहे त्याच प्रमाणात किंबहुना त्यापेक्षा जास्त रिकव्हरी रेट सुद्धा वाढत आहे ही दिलासादायक बाब आहे. हा लेख लिहीपर्यंत यापैकी १२ लाखाच्या आसपास रूग्णांनी कोरोनावर मात केली असल्याने रिकव्हरी रेट ६३ टक्के झाला आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात या देशाला वाचवण्याचे आणि सोबत अर्थव्यवस्थेला सावरण्याचे दुहेरी आव्हान कधीच ऊभा टाकले नव्हते. मोदी सरकारने या अभूतपूर्व संकटाचा सामना करताना कुशल नेतृत्वाचा परिचय दिला आहे. भारताची मोठी लोकसंख्या, तिची घनता आणि गरीबीचे आव्हान असताना सुद्धा या महामारीचा सामना करताना ईतर देशांच्या तुलनेत चांगले प्रदर्शन केले आहे. कोरोना महामारी विरूद्ध हे युद्ध सुरूच असून या नेतृत्वासोबत भारत हे युद्ध जिंकुन पुन्हा नव्याने ऊभा राहिल.  जगाला जसा महामारीचा इतिहास आहे तसा भारतालाही आहे. बरोबर शंभर वर्षांपूर्वी भारतात १९१८ ते १९२० च्या दरम्यान इंफ्लूएंजा महामारीन...

अर्थव्यवस्थेला ग्रामिणचा आधार

जा गतिकीकरणामुळे मोठया प्रमाणात शहरीकरण वाढले. लोकांचे रोजगारासाठी गावाकडून शहराकडे मोठया प्रमाणात पलायन झाले. जागतिकीकरणामुळे ग्रामिण अर्थव्यवस्था धोक्यात आली होती. कोरोनाच्या या जागतीक महामारीत हिच ग्रामिण व्यवस्थाच देशाचा आर्थिक आधार बनली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेवर नजर ठेवणारी संस्था सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (सीएमआईई) ने २१ जुनला जाहिर केलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, कोरोनामुळे ठप्प पडलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याच्या कामात गावं महत्वपूर्ण भूमिका निभावत आहेत. याच संस्थेने ३ मेला आकडेवारी जाहिर करून म्हटले होते की, देशात बेरोजगारीचा दर २७.१ टक्के वाढला आहे. त्यावेळी असं वाटल होत की, देशाची ढासळती अर्थव्यवस्था सावरणे खूप कठिण होणार आहे. शेवटी अस काय झाल की, केवळ दिढ महिन्यात या संस्थेच्या अहवालाने नविन आशा पल्लवित झाल्या. ज्या गावांना देशाच्या आर्थिक मागासल्यापणाला जबाबदार धरले जायचे, त्याच गावांकडे अर्थव्यवस्थेचे तारणहार म्हणून बघितल जात आहे. सीएमआईई च्या आकडेवारीनुसार २१ जुनला देशातील बेरोजगारीचा दर घटुन तो लॉकडाऊनच्या पूर्वी एवढा ८.५ टक्के झाला आहे....