भा रत हा जगातील श्रीमंत देशापैकी एक आहे , असे जर कोणी सांगितले तर त्यावर विश्वास बसणार नाही. पण वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने नुकताच एक अहवाल जारी केला आहे. तो पाहता भारतात असलेल्या सोन्यामुळे भारत नक्कीच जगात श्रीमंत देशातील एक आहे , असे म्हणता येणार आहे. कारण जगात सर्वाधिक सोने भारतीयांकडे आहे. आकडेवारीचा विचार केल्यास भारतीयांकडे तब्बल २१ , ७३३ टन सोने आहे. इतर देशांच्या तुलनेत हे सर्वाधिक आहे. त्यामुळे भारतीयांना सोन्याचे किती आकर्षण आहे , याचा अंदाज येतो. सोनं ! पिवळंधम्मक , झळाळतं , बावनकशी सोनं ! काळ बदलला , पिढय़ा बदलल्या , जगणं बदललं पण सोन्याला असलेलं महत्त्व कमी झालं नाही. वस्तुतः मानवजातीला असणा-या सोने जड जवाहीर्यांसारख्या चकाकत्या वस्तुंच्या आकर्षणाचे रहस्य मानववंशास्त्राला अद्यापी पुर्णतया उलगडले नसावे. बाकी जगातल्या लोकांना सोन्याचे वेड नसतेच असे नाही पण त्यात संपत्ती प्रेम अधिक आहे , भारतीयांच्या सुवर्ण प्रेमाचे स्वरुप आभूषण प्रेमाचे असावे. आपल्या देशात सोन्याचे वेड आणि परंपरा फार पूर्वीपासून आहे. सोने म्हण...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.