आपलं संपूर्ण आयुष्य दूस-यांची उणी-दूणी काढण्यात , त्यांच्यातील कमतरता शोधण्यात जात. स्वत:ला मात्र आपण फार कमी ओळखतो , त्यामुळे आपल्यात असलेली सुप्त कौशल्ये स्वत: आपल्याला माहित नसतात. काहीसं असच माझ्या बाबतीत झाल. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अगदी ११ वी पासून मी पत्रकारीतेला सुरूवात केली. दै. लोकप्रश्नला धारूर तालुका प्रतिनिधी म्हणून सहा वर्षे काम केल. पूढे मात्र शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी गाव सोडाव लागल आणि पत्रकारीता मागे सुटली. शिक्षक म्हणून काम करित असताना शाळेत नव्याने आलेल्या नकुशाच नाव बदलण्याचा प्रस्ताव मी कार्यालयामार्फत शिक्षण विभागाकडे पाठवला. मात्र अनेक महिने लोटुनही शिक्षण विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद भेटत नव्हता. तेंव्हा परत एकदा माझ्यातील पत्रकार जागा झाला आणि स्वानुभवातून लिहिलेला ‘नकुशा’ हा लेख साकार झाला. हा माझा पहिला लेख दै. झुंजार नेता मध्ये प्रकाशित झाल्यानंतर या दैनिकाचे तत्कालिन कार्यकारी संपादक अशोक देशमुख यांनी मला फोन करून लेखाची प्रशंसा केली सोबत पूढे लेखन सुरू ठेवा अशी सूचना केली. मी हो-नाही म्हणत जरा कचरतच होकार दिला खरा पण पूढे जमेल का न...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.