मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सामाजिक चळवळीचा आधारस्तंभ हरपला!

  ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे नुकतेच पुण्यात निधन झाले. महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचा फार मोठा वाटा आहे. श्रमिक, कष्टकरी, दुर्बल आणि वंचित घटकांच्या हक्कांसाठी आयुष्यभर अहोरात्र झटणारा महान संघर्षयोद्धा असं त्यांच वर्णन करता येईल. समाजातील सर्वात तळातील घटकाला न्याय मिळवून देणे, हाच त्यांचा ध्यास होता. संघर्षमय जीवन जगत त्यांनी प्रत्यक्ष कामातून समाजवादाची मूर्त प्रतिमा उभी केली. त्यांचा आशावाद, परखड विचार, निस्वार्थी वृत्ती आणि जनतेशी असलेली नाळ हे महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीचे मोठे बळ होते. बाबा आढाव यांचे कार्य म्हणजे समाजहितासाठीचे निर्भीड आणि ज्वलंत आयुष्य कसे असावे, याचे मूर्तिमंत उदाहरण होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील प्रगत, विचारशील चळवळीचे अपरिमित नुकसान झाले असून महाराष्ट्राने समाजसेवेचा महान तपस्वी गमावला आहे. बाबा आढाव यांचा जन्म १ जून १९३० रोजी पुणे येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव बाबासाहेब पांडुरंग आढाव असे आहे. बाबांनी प्राथमिक शिक्षण पुणे महानगरपालिकेच्या सार्वजनिक शाळेतून घेतले आणि उच्च शिक्षण पुण्यातील शिवाजी मराठा शाळेतून घेतले. १९५२ मध...

सरकारचा नवा कायदा अन् 'ऑनलाइन गेम्स' चा खेळ खल्लास

बुधवारी लोकसभेत माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी  ऑनलाईन बेटिंग गेमिंग अॅप्सवर बंदीचे विधेयक मांडले होते ते सरकारने मंजूर केले होते त्यानंतर ते राज्यसभेतही पारित झाले होते. शुक्रवारी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर या विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाले आहे. या विधेयकाचे नाव ऑनलाईन गेम प्रचार आणि नियमन विधेयक २०२५ असे आहे. या विधेयकानुसार, ई-स्पोर्ट्स आणि सोशल गेम्सना प्रोत्साहन दिलं जाईल, तर ऑनलाइन मनी गेम्सवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या विधेयकाच्या कलम २ (जी) नुसार, ज्या खेळांमध्ये खेळाडूला पैसे किंवा काही आर्थिक लाभाच्या बदल्यात जिंकण्यासाठी शुल्क, पैसे किंवा स्टेक्स गुंतवावे लागतात, अशा सर्व खेळांवर बंदी घातली जाईल. लोक फॅन्टसी स्पोर्ट्स गेम्स, ऑनलाइन रमी, कार्ड गेम्स, पोकर प्लॅटफॉर्म आणि ऑनलाइन टीम तयार करून थेट पैशांची गुंतवणूक असणारे गेम्स खेळू शकणार नाहीत. आता या कायद्यानुसार, कोणतीही व्यक्ती ऑनलाइन मनी गेम्सशी संबंधित जाहिराती तयार करू शकत नाही किंवा त्यामध्ये मदतही करू शकत नाही. जर कुणी अशा प्रकारचे गेम्स खेळण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करेल तर त्याला या क...

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

नैतिक मूल्यांचा –हास होतोय ....

कोणत्याही देशासाठी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची असते. तिथल्या नागरिकांमध्ये नैतिक मूल्य असावी लागतात. कोणत्याही धर्म, जात आणि पंथाच्या लोकांना त्या देशात मान-सन्मान मिळायला हवा. आज आपला देश प्रगतीच्या दिशेनं मार्गक्रमण करतोय. पण आजकाल दोन समाजांमध्ये वाद, भांडणं आणि त्याचं रूपांतर हिंसेमध्ये अगदी सहज होत आहे. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर रक्तपात घडवून आणले जात आहेत. अंधश्रद्धा, अज्ञानता, व्यसनाधिनता, भांडण-तंटे, स्वार्थ, विश्वासघात, गृहकलह, नात्यातील अविश्वास, भ्रष्टाचार इत्यादी जुन्या समस्यांसुद्धा कायम आहेत. शिक्षणामुळे सुद्धा त्यात फारसा फरक पडलेला नाही आणि पडणार देखील नाही. कारण समाजात शिक्षणाच्या नावाखाली जे काही शिकविले जाते त्यातून विद्यार्थी पैसा कसा कमवावा? याचे कौशल्य तर आत्मसात करतात मात्र नैतिक वर्तन कसे करावे? याचे कौशल्य आत्मसात करीत नाहीत. कारण त्यांना ते शिकवलेच जात नाही. माणूस म्हणून कसे वागावे ? दुस-यांच्या प्रती दया,करूणा, त्याग व निःस्वार्थ प्रेम  कसे करावे ? यासंबंधीचे शिक्षण कुठल्याही विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सामील नाही. पालक सुद्धा आपल्या मुलांवर नैतिक ...

शोषणमुक्तीचे शिलेदार : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे

तुकाराम भाऊराव ऊर्फ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे ह्यांचा जन्म १ ऑगष्ट १९२० रोजी सांगली जिल्ह्यात वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहान गावात झाला. अण्णाभाऊ साठे हे एक झपाटलेले लेखक होते. अण्णाभाऊंचे वेगळेपण म्हणजे त्यांनी कुठलेही औपचारिक शालेय शिक्षण घेतले नव्हते. शाळेची पायरीदेखील न चढलेल्या अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्यातील लोकवाङमय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट, पोवाडे, लावण्या, वग, गवळण, प्रवास वर्णन असे सर्वच प्रकार सशक्त व समृद्ध केले. त्यांनी ३७ कादंबऱ्या, १९ कथासंग्रह, १४ लोकनाट्ये, ११ पोवाडे, ३ नाटके, शेकडो गाणी, लावण्या, छकडी अशी विपुल साहित्यसंपदा निर्माण केली आहे. त्यापैकी सात कादंबऱ्यांवर नामवंत दिग्दर्शकांनी मराठी चित्रपटही काढले. अण्णाभाऊंच्या ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला. तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांनीही या कादंबरीचे कौतुक केले होते. केवळ वीस वर्षांच्या कालावधीत त्यांनी हे विपूल साहित्य निर्माण केले. ही खरोखरी अचंबित करणारी गोष्ट आहे.  सुरुवातीस ‘लोकयुद्ध’, ‘युगांतर’, ‘मराठा’ सारख्या दैनिकां...

नागपंचमीच्या निमित्ताने...

  जनमानसात श्रावण महिन्याला फार मोठे महत्व आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे बहुतेक धार्मिक सण या महिन्यात येतात. त्यामुळे या महिन्याला पवित्र महिना म्हणून मानले जाते. श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. सापाचे पर्यावरणीय महत्व आपल्या मनावर बिंबवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. यादिवशी स्त्रिया नवीन अलंकार, वस्त्रे नेसून नागदेवताची पूजा करतात. स्त्रिया पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करतात. नागदेवताची पूजा करून त्याला दुध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवला जातो. मात्र आता केवळ सापांची पूजा करून चालणार नाही तर त्यांना वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. नागपंचमीच्या निमित्ताने सापाविषयी असलेल्या अंधश्रद्धा नाहीशा करणे, गरजेचे आहे.  साप हा मांसाहारी प्राणी आहे. तो सस्तन प्राणी नाही. त्यामुळे तो लहान असताना सुद्धा दूध पीत नाही. त्य...

बालकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणारे पुस्तक ‘मनोरंजनातून विज्ञान’

 प्राध्यापक देवबा शिवाजी पाटील यांचे ‘मनोरंजनातून विज्ञान‘ हे नुकतेच बाळगोपालांसाठी प्रकाशित झालेले पुस्तक. या पुस्तकाचे मुखपृष्ठ बालकांना आकर्षित करणारे असून मलपृष्ठावर पुस्तकाविषयी मोजक्या शब्दात माहिती लिहिली आहे. पुस्तकाच्या शेवटी लेखकाचा परिचय आहे. या पुस्तकात सुंदरशा सहा विज्ञान बालकथा आहेत. निसर्गात घडणा-या विविध घटनांमागील वैज्ञानिक कारणे अत्यंत सोप्या, साध्या व मनोरंजक स्वरूपात कथा रुपात सांगितली आहेत. विज्ञान साहित्यातील विज्ञानकथा मुलांना खूप आकर्षित करतात. मुलांच्या विज्ञानकथा कशा असाव्यात या प्रश्नाच्या उत्तरात असे म्हटले जाते की मुलांच्या विज्ञानकथा या मनोरंजक शैलीत लिहिलेल्या काल्पनिक कथा असतात. कधीकधी विज्ञानाची तत्वे कठीण आणि कंटाळवाणी वाटतात. ती वर्गात समजत नाहीत, परंतु जेव्हा आपण ती विज्ञानकथेद्वारे समजावून सांगतो तेव्हा ती समजून घेणे सोपे होते. त्यामुळे शिक्षण प्रक्रिया मनोरंजक बनते. मुलांमध्ये शोध घेण्याची प्रवृत्ती आणि तर्कशक्ती विकसित होते. अशाच काल्पनिक कथा या पुस्तकात आहेत.   या विज्ञान कथा खूप मोठ्या आणि कंटाळवाण्या नाहीत सोबत प्रत्येक कथेत आकर्ष...