मुख्य सामग्रीवर वगळा

कृत्रिम बुद्धिमत्ता मानवासाठी धोकादायक ठरू शकते

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात गुंतवणूक करणा-या जगभरातील शेकडो कंपन्या त्याचा फायदा घेत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात मानवालाच हॅक केले जात असल्याचा दावा इस्रायलचे प्रख्यात इतिहासतज्ज्ञ आणि लेखक प्राध्यापक युवाल नोवा हरारी यांनी नुकताच केला आहे. सोशल मीडियावर आपण ज्या मित्रांची निवड करतोय कदाचित हा विचार केवळ आपलाच नसेल, ते कृत्रिम बुद्धिमत्ताने ठरवले असेल. आपले नाते कसे असावे, त्यातही हस्तक्षेप केला जातोय. समान राजकीय, धार्मिक विचारसरणीच्या लोकांना ‘व्होट बँक’बनवण्याचे लक्ष्य कृत्रिम बुद्धिमत्तेला दिले जाऊ शकते. त्या गटात लोकांना सामावून घेत नंतर प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तित्वाचा सखोल अभ्यास करून त्याचे विचार बदलले जाऊ शकतात. विश्वास ठेवा, जगात सध्या असे सुरू झाले आहे, असा दावा प्रा.हरारी यांनी केला आहे.

आजवर कृत्रिम बुद्धिमत्ता अनेकविध उद्योगांमध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी सज्ज झाली आहे. गेली अनेक वर्षं बुद्धिबळासारख्या खेळात कृत्रिम बुद्धिमत्ताने आव्हान दिलं होतंच; पण आताही आरोग्यसेवेपासून ते वित्त, वाहतूक ते उत्पादनापर्यंत सगळी कार्यं स्वयंचलित करण्यासाठी, कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि नावीन्यपूर्ण कामं साध्य करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता उपयोगात आणली जात आहे. सुरुवातीला ह्या तंत्रज्ञानाचे टीकाकार म्हणायचे, कितीही झालं तरी मानवी मनाचा परमोच्च आविष्कार म्हणजे त्याने निर्माण केलेल्या कला, संगीत, चित्रकारिता... ह्या सगळ्या उजव्या मेंदूच्या कलात्मक गोष्टी. यात कृत्रिम बुद्धिमत्ता काही करू शकणार नाही. पण आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून काल्पनिक चित्रं, चेहरे, संगीतसुद्धा तयार होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आता सिनेमाची पटकथाही लिहू लागले आहेत ! चित्रकलेत तर मानवालाही मागे टाकू शकेल, नवे कायदे बनवू शकते. आदी अगदी सर्वकाही करतेच आहे. कर्करोगासारख्या दुर्धर रोगांचं त्वरित निदान व्हावं आणि त्यावर औषधंही तयार व्हावीत यासाठी हे तंत्रज्ञान वापरलं जात आहे. गुगलसारखी कंपनी डायबेटिसमुळे येणारं अंधत्व टाळण्यासाठी आणि त्याचं लवकर निदान व्हावं म्हणून प्रयत्न करते आहे.

                               कल्पनाशक्तीच्या जोरावरच मानव समाजाची प्रगती होत आली आहे. आता हे कामसुद्धा कृत्रिम बुद्धिमत्ता करत असेल तर मग मानवाला काय काम राहील ? वास्तविक कृत्रिम बुद्धिमत्ता हे आतापर्यंत केवळ एक साधन होते. ते आपल्याला विश्लेषणात मदत करीत असे अथवा सूचना देत होते. परंतु आता कृत्रिम बुद्धिमत्तेने कल्पना करून आपल्याला मार्गदर्शन करण्यासही सुरुवात केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता स्वत:च नवे विचार, नव संस्कृतीला आकार देऊ शकतात. अत्यंत धोकादायक अणुबॉम्ब स्वत: एखादा नवा अणुबॉम्ब तयार करू शकत नाही, परंतु कृत्रिम बुद्धिमत्ता स्वत: विचार करुन तिच्यापेक्षा कैकपटीने जास्त घातक कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करु शकते.

                              तंत्र, उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याची तीव्र स्पर्धा ही धोकादायक असून त्यामुळे अनियंत्रित झालेली कृत्रिम बुद्धिमत्ता मानवाच्या डोक्यावर बसेल अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. मानवी बुद्धीमत्तेशी स्पर्धा करणा-या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचा अतिरेक हा मानवासाठी भस्मासुर ठरेल. त्यामुळे इंटरनेटवर खोट्या, चुकीच्या, अनावश्यक आणि घातक माहितीचा महापूर लोटेल. तीव्र स्पर्धेतून निर्माण करण्यात आलेली कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साधने कालांतराने हाताबाहेर जातील. त्यांच्यावर निर्मात्यांचेही कसलेच नियंत्रण राहणार नाही. अशा परिस्थितीत त्यांना वठणीवर आणण्यासाठी काय करावे लागेल, हे अनाकलनीय असेल अशी भीती सध्या व्यक्त करण्यात येत आहे.  कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सध्या गुन्हेगारी प्रवृत्ती विशेषत: दहशतवादी संघटनाही करीत आहेत.

कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित केल्याने मानवजातीचा अंत होण्याची भीती जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी यापूर्वी व्यक्त केली होती. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संकल्पनेचा प्राथमिक विकास आप याआधीच केला आहे. मात्र या संकल्पनेचा संपूर्ण विकास मानवजातीसाठी प्राणघातक ठरेल. हे झपाट्याने विकसित झालेले तंत्रज्ञान मानवजातीच्याही पुढे जाऊ शकते. मानवास नैसर्गिक उत्क्रांतीच्या मर्यादा आहेत. संपूर्णत: विकसित झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा सामना मानव करु शकणार नाही व तो नष्ट होईल, असे जगामधील सर्वांत प्रतिभावान शास्त्रज्ञांपैकी एक मानल्या जाणा-या हॉकिंग यांनी सांगितले होते. मात्र हॉकिंग यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या फायद्यांपासून वंचित राहणे योग्य नसल्याचे मतही यावेळी व्यक्त केले होते. इंटरनेटचे फायदे व तोटे दोन्ही असल्याचे हॉकिंग यांनी यावेळी स्पष्ट केले होते. तंत्रज्ञानाच्या वापरामधील अशा स्वरुपाचे धोके टाळण्यासाठी कंपन्यांनी अधिक प्रभावशाली उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. मात्र स्वातंत्र्य व खासगी आयुष्य यांचा त्याग न करता अशा स्वरुपाची उपाययोजना करणे तितकेच कठीण आहे. सध्या इंग्लंडमध्ये आणि युरोपियनच्या सदस्य  देशांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराचे नियमन करण्यासाठी कायद्याची चौकट आखण्याचे काम सुरू आहे.

- सुरेश मंत्री

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...