आपले सहा नगरसेवक शिवसेनेने फोडल्याने राज ठाकरे खूप अस्वस्थ झाले आहेत. दुसरीकडे भाजपा सुद्धा बैचेन आहे की त्यांना ही संधी का मिळाली नाही? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी, शिवसेना आणि भाजप यातील संबंध दिवसेंदिवस खूप खराब होत असल्याने खूप आनंदी आहेत मात्र हे पक्ष स्वतः घाबरलेले आहेत त्यांना भीती वाटत आहे की, शिवसेनेला प्रतिउत्तर देण्यासाठी कदाचित भाजप त्यांचे नगरसेवक फोडणार तर नाही ना? सत्ता मिळवण्याच्या या स्पर्धेत आपले कोण आणि परके कोण काही समजायला मार्ग नाही, सर्व काही अविश्वसनीय होत चालले आहे.आता एक प्रश्न निर्माण होतो की, जे लोक आपल्या पक्ष आणि नेत्यांच्या प्रती प्रामाणिक नाहीत लोक त्यांच्यावर विश्वास कसा काय ठेवतात? राजकारणात पक्षांतर करणे ही काही नविन गोष्ट नाही आणि कोणताही पक्ष यापासून वाचलेला नाही माञ ज्या पक्षाचा नेता पक्षांतर करतो तो पक्ष टिका व्यक्त करित असतो तर हा नेता ज्या पक्षात जातो तिथे त्याच्यासाठी पायघड्या आंथरल्या जातात. राज ठाकरे आज दु:ख व्यक्त करित आहेत. त्यांनी सांगितल की, मी त्यांना काय कमी केल? राज ठाकरे हे विसरताहेत की, कधी काळी त्यांन...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.