मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

महाराष्ट्रातील सत्तेचा खेळ

 आपले सहा नगरसेवक शिवसेनेने फोडल्याने राज ठाकरे खूप अस्वस्थ झाले आहेत. दुसरीकडे भाजपा सुद्धा बैचेन आहे की त्यांना ही संधी का मिळाली नाही? काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टी, शिवसेना आणि भाजप यातील संबंध दिवसेंदिवस खूप खराब होत असल्याने खूप आनंदी आहेत मात्र हे पक्ष स्वतः घाबरलेले आहेत त्यांना भीती वाटत आहे की, शिवसेनेला प्रतिउत्तर देण्यासाठी कदाचित भाजप त्यांचे नगरसेवक फोडणार तर नाही ना? सत्ता मिळवण्याच्या या स्पर्धेत आपले कोण आणि परके कोण काही समजायला मार्ग नाही, सर्व काही अविश्वसनीय होत चालले आहे.आता एक प्रश्न निर्माण होतो की, जे लोक आपल्या पक्ष आणि नेत्यांच्या प्रती प्रामाणिक नाहीत लोक त्यांच्यावर विश्वास कसा काय ठेवतात? राजकारणात पक्षांतर करणे ही काही नविन गोष्ट नाही आणि कोणताही पक्ष यापासून वाचलेला नाही माञ ज्या पक्षाचा नेता पक्षांतर करतो तो पक्ष टिका व्यक्त करित असतो तर हा नेता ज्या पक्षात जातो तिथे त्याच्यासाठी पायघड्या आंथरल्या जातात. राज ठाकरे आज दु:ख व्यक्त करित आहेत. त्यांनी सांगितल की, मी त्यांना काय कमी केल? राज ठाकरे हे विसरताहेत की, कधी काळी त्यांन...

दीपावली साजरी करताना !

आपल्या   देशातील दीपावली हा अतिशय महत्वाचा सण. हा सण जणू एका पॅकेजच्या स्वरूपात येतो. धनत्रयोदशी , लक्ष्मी   पुजनआणि भाऊबीज या सणांसोबत संपूर्ण महिना एखाद्या उत्सवाच्या स्वरूपातच निघून जातो. या सणाचे पौराणिक आणि सामाजिक महत्व आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने माहित आहे मात्र या गोष्टीचे दु:ख होते की ,  कित्येक वेळा सणांचे नकारात्मक चित्रण आपण आपल्या मनात करून बसतो. न केवळ आपण नकारात्मक चित्रण करून बसतो तर याला आपल्या जीवनात अंगिकारून दूस-यांचे नूकसान करण्यात प्रमुख भागिदारही बनतो. दीपावलीच्या वेळी जे सण येतात त्यांची नकारात्मक व्याख्या आणि चूकीच्या परंपरा आपल्यासाठी कशा प्रकारे हानीकारक असतात हे समजून घेणे खूप आवश्यक आहे. वस्तूंची खरेदी करताना - या सणाच्या वेळी सर्वात अगोदर येणारा सण म्हणजे धनत्रयोदशी. या वेळी लोक नव्या वस्तूंची खूप मोठया प्रमाणावर खरेदी करतात. बाजारपेठ ही भरलेली असते ,  वेगवेगळ्या प्रकारच्या भेटवस्तू खरेदी केल्या जातात.  अनेक ऑनलाईन संकेतस्थाळांवर वेगवेगळ्या प्रकारच्या ऑफर्स दिल्या जातात. एकूण ग्राहकांना खरेदी करण्यासाठी जबरदस्त पद्धतीने प...

विरोधी पक्षांमध्ये एकजुट का नाही?

देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या सत्तर वर्षानंतर प्रथमच भारतीय समाज आणि राजकारण दोन गटात विभागल्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे.एकीकडे हिंदू राष्ट्र निर्मितीची धारणा घेवून चालणा-या संघटना आहेत ज्यांना २०१४ च्या लोकसभा निवडणूकीनंतर सत्तेवर मजबूत पकड बनवून ठेवली आहे.ज्यांच्या विचारधारेचे आधार आपले प्राचिन ग्रंथ रामायण , महाभारत , वेद आणि उपनिषद आहेत तर दूस-या गटात असे राजकिय पक्ष आहेत जे असे मानतात की , भारतीय राजकारण १९५० च्या भारतीय घटनेच्या मूळ संरचनेच्या आधारावर चालले पाहिजे आणि सत्तेचा आधार स्वातंत्र्य , समानता आणि सहिष्णुता सारखी मूल्ये असली पाहिजेत. प्रश्न हा आहे की , भारताला केवळ हिंदू राष्ट्राच्या रूपात बघितल जावू शकत का ? भाजपाची वैचारिक धारा ही संघ परिवाराला अनुसरून राहिली आहे.यासाठी संघ परिवाराच्या वैचारिक अभियानाला रोखणे हेच एकमेव उद्दिष्ट अशा विरोधी पक्षांचे बनत चालले आहे जे सामाजिक विविधतेचे समर्थक आहेत आणि पूर्ण देशाला सोबत घेवून चालू ईच्छितात. संघ परिवाराच्या विचारधारेचा विरोध करणारे हे विरोधी पक्ष केंद्र आणि राज्यांतील भाजपाचा विजय रथ रोखू ईच्छितात मात्र त्यांच्य...

फक्त रोहिंग्यांच्याच बाबतीत दूजाभाव का ?

म्याममारमधून विस्थापित झालेले जवळपास चाळीस हजार रोहिंग्या मुसलमान भारताकडे शरण मागत आहेत.भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयात देशाच्या सुरक्षेला रोहिंग्या मुसलमानांपासून धोका असल्याचे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.सरकारचा हेतू हाच की,सर्वोच्च न्यायालयाने यात दखल देवू नये.यावर न्यायालयात ३ ऑक्टोंबरला सुनावणी होणार आहे.जी लोक आपला जीव वाचवण्यासाठी आपला देश सोडून दूस-या देशात शरण मागण्यासाठी विवश आहेत ते दहशतवादी कसे काय असू शकतात?ज्या लोकांची घरे आणि गावेच्या गावे जाळण्यात आली आहेत ते आपली तान्ही मुल आणि गर्भवती महिलांना सोबत घेवून हजारो किलोमीटर दूर पळण्यासाठी विवश आहेत,खरंच ही लोकं देशाच्या सुरक्षिततेला धोका आहेत का? भारत सरकारचे असे मत आहे की,रोहिंग्यांचा देशाच्या सुरक्षिततेला धोका आहे.काही रोहिंग्यांचा जम्मू,दिल्ली,हैद्राबाद मध्ये दहशतवादी कारवायात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे.सरकारचे असेही मत आहे की,भारताची लोकसंख्या अगोदरच अधिक असल्याने यांना शरण देवून देशातील नैसर्गिक साधन संपत्तीतून सूविधा दिल्यास याचा नागरिकांवर वाईट परिणाम होईल तसेच अनेक रोहिंग्यांकडे अगोदरच खोटे पॅनकार्ड आणि ...

देशातील उच्च शिक्षणाची अवस्था वाईट

अस वाटत आहे की , देशातील उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षणाचे वाईट दिवस आले आहे त.उच्च शिक्षणाचा दर्जा ढासळत असल्याची चर्चा मागिल पाच वर्षापासून सूरू आहे मात्र कोणत्याही सरकारने यासाठी काहीच केले नाही.आता देशातील उच्च शिक्षण पूर्णपणे ध्वस्त झाले आहे.काही दिवसांपूर्वी उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षणाची सर्वात मोठी नियामक संस्था ऑल इंडिया कांउसिल फॉर टेक्निकल एजुकेशन (एआईसीटीई) ने निश्चित केले आहे की , ज्या इंजिनियरिंग महाविदयालयांमध्ये मागिल ५ वर्षात ३० टक्के पेक्षा कमी प्रवेश झाले आहेत अशी महाविदयालये बंद करण्यात येतील. सध्या देशभरात एआईसीटीईशी संलग्न १० , ३६१ इंजिनियरिंग महाविदयालय आहेत ज्यात ३ , ७०१ , ३६६ जागा आहेत.या ३७ लाख जागांपैकी २७ लाख जागा खाली आहेत.निश्चितच ही आकडेवारी खूप भयावह आहे. एआईसीटीईने सुरवातीला ना काही विचार करता , ना गुणवत्तेची चिंता करता देशात हजारो इंजिनियरिंग महाविदयालयांना परवानगी देवून टाकली आणि विना मागणी आणि पूरवठा या तत्वाचा व रोजगाराचा विचार करता एवढया मोठया प्रमाणावर जागा निर्माण केल्या.आता या जागाच भरत नसल्याने एआईसीटीई चिंतीत झाले आहे. व्यावहारिकतेपासून दूर...

शिक्षक बनायचय ? नकोरे बाबा !

नु कताच ५ सप्टेंबरला देशभरात शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला.   देशात ठिक- ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या दिवशी शिक्षकांचे गुणगौरव गावून शिक्षकी पेशाला महान महान म्हटले गेले. मात्र खरच आपल्या देशात शिक्षण आणि शिक्षकांचा सन्मान आहे का ? आता शिक्षक कोण बनत आहेत ? जर आपण कुण्या शहरात किंवा महानगरात राहत असताल तर आपल्याला हे दिसेल की , आपल्या आसपास राहणारे शेजारी-पाजारी विविध क्षेत्रात नौकरी करित आहेत , पण ते शिक्षक नाहीत. शाळेतील शिक्षक बनायला घेवून जणू सगळ्या समाजात विरक्ती आली आहे. हुशार तरुण शिक्षक बनण्याऐवजी खासगी क्षेत्रात छोट्या-मोठ्या नौक-या करणे पसंद करू लागले आहेत. वर्तमानपत्रात छापल्या जाणा-या विवाह संबंधी जाहिरातींचा अभ्यास करून पहा. यात आपल्याला शिक्षक वरांच्या जाहिराती खूप कमी दिसतील. भावी वधू शिक्षिका तरी मिळेल मात्र भावी वर शिक्षक मिळण्याची शक्यता खूप कमी होते. एनसीईआरटीच्या ताज्या आकडेवारीनूसार , देशातील शिक्षकांपैकी ६९.१ महिला शिक्षिका आहेत. शाळात तेच शिक्षक बनत आहेत ज्यांना इतर क्षेत्रात नौकरी मिळत नाही. मोठ्या सरकारी नौक-यां...