मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

सेवा हाच खरा धर्म

काही दिवसांपूर्वी मी काही खाजगी कामानिमित्त शिर्डीला गेलो होतो.अर्थात तिथ गेल्यानंतर साई बाबांचे दर्शन घेतल्याशिवाय मी कसा राहणार?माझ्या मनात साईंची प्रतिमा नेहमी एक अशा संताच्या स्वरूपात राहिली आहे जे फाटके कपडे घातलेले आणि डोक्यावर रूमाल बांधलेले साई लोकांच्या मदतीसाठी एका ठिकाण्याहून दूस-या ठिकाणी जात होते.मात्र साई मंदिरात त्यांचे जे रूप पहायला मिळाले ते पाहून माझ्या मनाला मोठा धक्का बसला.फकीर असलेल्या साईंना त्यांच्या भक्तांनी सोन्याने मढवून ठेवले आहे.साई तर असे योगी आणि फकीर होते ज्यांनी प्रेम,सेवा,क्षमा,दान आणि संयमाची शिकवण दिली.त्यांच्या या शिकवणीच त्यांचे भक्त किती पालन करत आहेत हे माहित नाही मात्र त्यांनी साईंना संपत्तीने लादून टाकलेल दिसत.ज्या साईंवर त्यांचे भक्त आज लाखो रूपये खर्च करत आहेत ते तर एका लिंबाच्या झाडाखाली राहत आणि भिक्षा मागून गुजराण करत.निदान साईंसाठी भक्तांनी सोन्याचे कपडे बनवले नाहीत एवढच काय ते समाधान. अमृतसरचे सुवर्ण मंदिर तर चारही बाजूंनी सोन्याने मढविलेले आहे.अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला गुरू नानक आणि शिख गुरूंच्या बलिदानाच प्रतिक मानल जात.गुरू नानक स...

स्वछतेसाठी एक पाऊल पुढे

काही दिवसांपूर्वी स्वछता सर्वेक्षणाचे निकाल जाहिर करण्यात आले आणि या सर्वेक्षणानूसार अनेक शहरांना स्वछ घोषित करण्यात आले.या मागिल भावनेचा निश्चितपणे सन्मान केला पाहिजे.मात्र या योजनेत एक प्रकारची अनाकलनियता दिसून येते तिला अधोरेखित करणे गरजेचे आहे.इंदौरला तिस-यांदा स्वछतेत पहिले स्थान मिळाले आहे,हा नक्कीच योग्य निर्णय आहे कारण तेथील नागरिक स्वछतेच्या बाबतीत खरेच जागरूक आहेत.मात्र ज्या शहरात डंपिंग ग्राउंडचा कुठेच पत्ता नाही आणि त्या शहरांच्या प्रत्येक गल्लीचा कोना कच-याने भरलेला आहे अशा काही शहरांना स्वछ घोषित करण्यात आले आहे यामुळे या एकूण निवड प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह उभा राहतात. खरं तर स्वछता हा सामाजिक विषय आहे.ही सरकारपेक्षा नागरिकांची जबाबदारी जास्त आहे.जिथला समाज जागरूक आहे तिथे आपोआप स्वछता राखली जाते.देशातील कित्येक गावात बघा तिथे शहरांसारखी अस्वछता पसरलेली नाही.तिथे स्वछता हा प्रतिष्ठेचा विषय समजला जातो.अशा प्रकारची गावे आज सुद्धा कोणत्याही प्रकारच्या सर्वेक्षणावर आधारलेली नाहीत.सरकारी आर्थिक मदती विना आणि प्रकल्पाविना कुठे जर स्वछता कायम होत असेल तर ते ठिकाण आपल्यासाठी आ...

युती,आघाडयांचा वेग वाढला

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरून गेलेला असला तरी राजकीय पक्षांनी आपल्या राजकीय हालचालींचा आणि राजकीय समिकरणे जुळवण्याचा वेग मात्र यत्किंचितही कमी केलेला नाही.या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या सभा आणि विविध प्रकल्प उद्घाटन सभारंभाचा धडाका कायम आहे.देशात भाजपासोबत विविध राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणूकीची तयारी युद्ध स्तरावर सुरू केली आहे. दोन्ही बाजूने महायुती करण्यासाठी स्पर्धा लागली आहे.एक-एक पक्ष आणि एक-एक राज्याच्या नफ्या-तोटयाचा विचार केल्यानंतर पक्ष आपसात चर्चा करत आहेत.            भाजपाने आपल्या नाराज असलेल्या जुन्या सहकारी पक्षांचे मन वळवण्यासाठी कसरत सूरू केली आहे ज्यात केवळ लोकसभा निवडणूकीत चांगले प्रदर्शनच नाही तर निवडणूकीनंतरच्या डावपेचाही विचार केला आहे.भाजपा आपल्या एनडीएला सर्वात मोठी निवडणूक पूर्व महाआघाडी दाखवण्याच्या प्रयत्नात आहे.दूसरीकडे काँग्रेसही महाआघाडीच्या आधारे निवडणूक रिंगणात उतरणार आहे. नुकतच भाजपाने महाराष्ट्रात शिवसेनेसोबत युती केल्याची घो...

काँग्रेसचे विधान लज्जास्पद

काँग्रेस पक्षाच्या नुकत्याच झालेल्या अल्पसंख्यांक अधिवेशनात महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांनी म्हटले की,जर २०१९ मध्ये काँग्रेस सत्तेत आली तर तीन तलाक कायदा रद्द केला जाईल.त्यांचे हे विधान ऐकूण खूप वाईट वाटले की,त्या स्वत: एक महिला असून सुद्धा त्यांनी इस्लामच्या नावावर महिलांच्या अधिकारांच हनन करणा-या मुल्लांसारख विधान का बरं केल असेल?विशेष म्हणजे या अधिवेशनात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी स्वत: हजर होते.राजकारण आपल्या जागी आहे मात्र केवळ मतांसाठी एका धर्माच्या महिलांच वर्षानुवर्षे होत असलेल शोषण रोखणारा कायदाच रद्द करण्याची गोष्ट करणे न्याय संगत कस होईल?निश्चितच मुस्लिम तुष्टीकरणाच्या राजकारणाच्या टोकावर पोहचून मुस्लिम पुरुषांना स्वत:कडे वळविण्यासाठी काँग्रेसने परत एकदा राजकारणाच्या पटावर खूप खालच्या थरातील डाव खेळला आहे. पाकिस्तान सारख्या कट्टर मुस्लिम देशात तीन तलाकवर कित्येक वर्षांपूर्वीच बंदी घालण्यात आली आहे.हे आपले दुर्भाग्य आहे की,भारतासारख्या लोकशाही असलेल्या देशात एक राष्ट्रीय पक्ष या गोष्टीवर मत मागत आहे की,तो मुस्लिम महिलांच्या या शोषणाच्या पद्धतीवर लागलेली...

विवाह संस्थेवरिल वाढता विश्वास

असं म्हणतात की , या पृथ्वीवर ८४ लाख योनी आहेत आणि या योनी पार केल्यानंतर मनुष्य जन्म मिळतो.मनुष्य हा सर्व सजिवात श्रेष्ठ आहे हे सर्वांनाच माहित आहे.मनुष्य आपली निष्ठा , कर्तव्य आणि जबाबदारी पार पाडण्याच्या प्रवृतीमुळेच सर्वश्रेष्ठ आहे.वैवाहिक जीवन स्विकारणे हे याच जबाबदा-यांपैकी एक आहे.याच जबाबदारीत दोन अनोळखी जीव सोबत राहणे , सुख-दु:खात वाटेकरी होण्यासोबत मरेपर्यंत एकमेकांची सोबत न सोडण्याची शपथ घेतात सोबत अपत्यांना जन्म देवून आपला वंश पूढे वाढवितात.विवाहाची ही परंपरा जवळपास सर्व जगात वेगवेगळ्या रुपाने कार्यरत आहे.मध्यंतरीच्या काळात युवक पिढीचा विवाह संस्थेवरिल विश्वास उडत चालला होता आणि त्यांचा लग्न न करता लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याकडे कल वाढत चालला होता   मात्र नजिकच्या काही उदाहरणांवरून युवकांचा विवाह संस्थेवरिल विश्वास वाढल्याचे दिसून येत आहे.   युवक आपले अर्धे आयुष्य लग्न न करता घालवतात ही आता ही सामान्य गोष्ट झाली आहे मात्र दिपीका पदुकोण आणि रणविर सिंह , अनुष्का-विराट कोहली , सोनम-आनंद आहुजा यासारख्या अनेक सेलीब्रेटीजनी स्वत:ला मागिल काही दिवसात लग्नाच्या ...

सरकारला नीति बदलाची गरज

मागील चार वर्षात भाजपाने गाय आणि राम मंदिर मुद्द्यांच्या आधारे हिंदू मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला सोबत त्यांनी विकसित देशांप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था वाढवण्याचा प्रयत्न केला.मेक-इन-इंडिया , बुलेट ट्रेन या संकल्पना याचाच भाग होत्या.विकसित देशांचे अनुकरण करतानाच अगोदर नोटाबंदी आणि त्यानंतर जीएसटी लागू करण्यात आली जेणेकरून विकसित देशांप्रमाणे डिजीटल अर्थव्यवस्था स्थापित होईल मात्र सरकारची ही पाऊलं खास करून तिच्यासाठी हानीकारक ठरली आहेत.नोटाबंदी आणि जीएसटीने लहान उद्योगांना उद्धवस्त केले आहे.या लहान उद्योगांमुळेच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होत होता त्यामुळे रोजगारात कमतरता निर्माण झाली आहे.रोजगारात कमी आल्याने सामान्य माणसाच्या क्रय शक्तीचा –हास झाला आहे त्यामुळे बाजारपेठेत एक प्रकारचे मंदीचे सावट आले आहे.या कारणांमुळेच अर्थव्यवस्थेचा विकास दर पूर्ववत ७ वर टिकून आहे.   गरीबाने जर श्रीमंत माणसाप्रमाणे १०० रुपयांची एक कप चहा पिली तर त्याच महिन्याच बजेट बिघडून जात काहीस असच भारताद्वारे विकसित देशांची नीति लागू केल्याने भारताची अर्थव्यवस्था बिघडली आहे.वर्तमान भाजपा ...

यंत्र आणि मानव

हे सर्व तर ठिक आहे पण तु नेमक काय काम करतोस ? मुलीचे वडिल आपल्या मुलीच्या मित्राला विचारत आहेत.त्यांच्या प्रश्नात शक्यतेच्या शोधासोबत मोठ्या प्रमाणावर सांशकता आहे.सर्जनशिलता तर ठिक आहे मात्र यात पैसा कुठे आहेत ? हे दृश्य आजचे नाही तर भावी काळाचे आहे कारण त्या काळात सर्जनशिलता माणसाची नाही तर दुस-याच कुणाची तरी होवून जाईल.आज यंत्र मानवी जीवनाचा अविभाज्य अंग होवून राहिली आहेत.या यंत्रांमुळेच मी-आपण एवढे बदलले आहोत की हे दृश्य जर एखादा १५ व्या शतकापूर्वीच्या मानवाने बघितले असते तर तो हे बघून बेशुद्ध झाला असता किंवा आपल्या डोळ्यावरच विश्वास ठेवू शकला नसता.आपल जीवन यंत्रांच्या साह्याने अधिक सुखकारक करण्याच्या प्रयत्नात आज मानवाचीच यंत्र बनण्याची वेळ आली आहे एवढच नाही तर भविष्यात त्याच अस्तित्वच धोक्यात येणार आहे. यंत्रांचा पहिला संबंध माणसाच्या बेरोजगारीशी आहे.यंत्र आली , त्यांनी मानवाच्या पेक्षाही अधिक कुशलतेने आणि वेगाने कामे केली तर माणस कुठ जातील ? ती आपल पोट कस भरतील ? त्यांच्या कुटुंबाच काय होईल ? हा प्रश्न जवळपास २०० वर्षांपूर्वी मानवाला पडला होता.हा प्रश्न आणि त्याला जोडून अ...