काही दिवसांपूर्वी मी काही खाजगी कामानिमित्त शिर्डीला गेलो होतो.अर्थात तिथ गेल्यानंतर साई बाबांचे दर्शन घेतल्याशिवाय मी कसा राहणार?माझ्या मनात साईंची प्रतिमा नेहमी एक अशा संताच्या स्वरूपात राहिली आहे जे फाटके कपडे घातलेले आणि डोक्यावर रूमाल बांधलेले साई लोकांच्या मदतीसाठी एका ठिकाण्याहून दूस-या ठिकाणी जात होते.मात्र साई मंदिरात त्यांचे जे रूप पहायला मिळाले ते पाहून माझ्या मनाला मोठा धक्का बसला.फकीर असलेल्या साईंना त्यांच्या भक्तांनी सोन्याने मढवून ठेवले आहे.साई तर असे योगी आणि फकीर होते ज्यांनी प्रेम,सेवा,क्षमा,दान आणि संयमाची शिकवण दिली.त्यांच्या या शिकवणीच त्यांचे भक्त किती पालन करत आहेत हे माहित नाही मात्र त्यांनी साईंना संपत्तीने लादून टाकलेल दिसत.ज्या साईंवर त्यांचे भक्त आज लाखो रूपये खर्च करत आहेत ते तर एका लिंबाच्या झाडाखाली राहत आणि भिक्षा मागून गुजराण करत.निदान साईंसाठी भक्तांनी सोन्याचे कपडे बनवले नाहीत एवढच काय ते समाधान. अमृतसरचे सुवर्ण मंदिर तर चारही बाजूंनी सोन्याने मढविलेले आहे.अमृतसरच्या सुवर्ण मंदिराला गुरू नानक आणि शिख गुरूंच्या बलिदानाच प्रतिक मानल जात.गुरू नानक स...
या ब्लॉगवर विविध शेक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय विषयांवर विचारमंथन करण्यात आले आहे.