मुख्य सामग्रीवर वगळा

सामाजिक ऐक्य महत्वाचे

                            

    हिन्दू कहें मोहि राम पियारा, तुर्क कहें रहमाना।

    आपस में दोउ लड़ी-लड़ी मुए, मरम न कोऊ जाना।।

संत कबीर म्हणतात, हिंदू मानतात की राम सर्वोच्च आहे, तर मुस्लिम मानतात की रहमान सर्वोच्च आहे. या मुद्द्यावरून दोघांमध्ये भांडण झाले. दोघांनाही गुपित माहीत किंवा समजलेले नाही. धर्माच्या नावावर संघर्ष सुरू आहे, पण कोणताही धर्म संघर्ष शिकवत नाही, कोणताही धर्म हिंसेला प्रोत्साहन देत नाही, कोणताही धर्म हिंसाचार, जुलूम, भेदभाव आणि एकमेकांविरुद्ध उच्च-नीच यांना प्रोत्साहन देत नाही. परंतु एखादी व्यक्ती आपल्या धर्माला सर्वोच्च बनवण्यासाठी अनैतिक कृत्यांचा अवलंब करते आणि व्यर्थ कृत्यांमध्ये आपले जीवन संपवते. त्यामुळे त्याच्या आयुष्यात प्रगती होत नाही किंवा समाजासाठी काही उपयोग होत नाही. ‘क्या बहरा हुवा खुदाय ’ म्हणत कबीरांनी समाजाला सांगितले की, देव किंवा अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी बाह्य दिखाव्याची काय गरज आहे? देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठ्याने प्रार्थना करण्याची गरज नाही कारण अल्लाह किंवा देव बहिरे नाही. परमेश्वर सर्व ऐकतो, सर्व पाहतो. आपल्या अंतर्मनात  काय चालले आहे तेही त्याला माहीत असते. हिंदू आणि मुस्लिम सनातन्यांनी जिवंतपणी कबीरांना कमालीचा विरोध केला. पण कबीरांना या दोन्ही समाजातील सर्वसामान्य माणूस आपले मानत होता. खरेतर धर्म, कर्मकांडे वगैरे बाबी त्याज्य मानणाऱ्या कबीरांना हिंदू  'हिंदु' मानत आणि मुसलमान 'मुस्लीम' मानत. त्यामुळेच कबीरांच्या मृत्यूनंतर त्यांचे 'दहन' करायचे की 'दफन 'याबाबत मोठा वाद झाला. आजच्या बिघडलेल्या (बिघडवलेल्या) परिस्थितीत माणूस व माणुसकी दोन्हीही ढासळत चालली आहेत. त्यातून सावरण्यासाठी संत कबीर यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे.

गेल्या काही वर्षांत भारतात धार्मिक तेढ वाढवणाऱ्या घटना वारंवार घडायला लागल्या आहेत. आजकाल इथे सार्वजनिक जीवनात जे काही घडत आहे, ते प्रदर्शनासाठी किंवा सूडासाठी घडत आहे. इथे इतरांना चिडवण्यासाठी पूजा केली जाते, मिरवणुकीत इतर समाजाला शिवीगाळ केली जाते. अदृश्याची भीती घालवण्यासाठी हनुमान चालिसाचे पठण केले जाते, मात्र येथे भीती निर्माण करण्याचे काम केले जात आहे. अजानला विरोध करण्यासाठी लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवली जाते. एकेकाळी देवाला प्रेमाचे दुसरे नाव दिले जात होते, देव प्रेमाला पर्याय होता, तो खूनाच्या देवामध्ये बदलला जात आहे. संशय, संशय, द्वेष, खून ही या नव्या समाजाची मूल्ये होत आहेत. भारतीयांच्या कानावर आता सतत धार्मिक तेढ वाढवणारी विधानं पडत असतात. दोन्ही बाजूंनी द्वेषाचा मारा होत असतो. सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनल्सवरही अशा प्रकारच्या वक्तव्यांना प्रसिद्धी मिळते, अगदी लहानशा राजकारण्याने असं विधान केलं असलं तरी त्या विधानांच्या हेडलाईन्स बनवल्या जातात.

आधी अशा प्रकारची विधान निवडणुकांच्या काळात व्हायची. पण आता सोशल मीडियामुळे राजकारण्यांना कळून चुकलं आहे की एका राज्यात काही धार्मिक तेढ वाढवणारी विधानं केली की दुसऱ्या राज्यात त्याला मोठं करून लगेचच राजकीय फायदा मिळवता येऊ शकतो. भारतात दोन किंवा अधिक समुदायांमध्ये धार्मिक तेढ वाढवणं, तशा प्रकारची वक्तव्यं किंवा कृती करणं तसंच कोणत्याही धर्माचा अपमान होईल अशा कृती मुद्दाम करणं कायद्याने गुन्हा आहे. धार्मिक तेढ वाढवणाऱ्या विधानांचा मुद्दा अनेकदा कोर्टासमोर आलाय. पण न्यायव्यवस्था भाषण स्वातंत्र्यावर बंधनं घालू इच्छित नाही. सुप्रीम कोर्टाने २०१४ साली एका याचिकेवर सुनावणी करताना द्वेष पसरवणा-या विधानांच्या घटना कमी व्हाव्यात म्हणून काही निर्देश दिले होते. कोर्टाने असंही म्हटलं की, अशी विधानं लोकांवर वाईट परिणाम करू शकतात. पण सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या कक्षेपलिकडे जाण्यास कोर्टाने नकार दिला. जोपर्यंत अशी विधानं करणाऱ्या लोकांना शिक्षा होणार नाही तोपर्यंत इतर लोकांना जरब बसणार नाही. अशा प्रकारची विधान सतत होतात अशा वातावरणात लोकांच्या मनात असुरक्षितता आणि भीती निर्माण होते. ते रोजच्या आयुष्यातले सामाजिक संबंध टिकवू शकत नाही, संवाद साधू शकत नाही, आपली व्यावसायिक कामं करू शकत नाहीत.

  महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा एकदा मशिदीवरील भोंग्यांवरून वातावरण तापलं आहे. केवळ मशिदीतच नाही तर गुरुनानक जयंती, ईद ए मिलाद, ख्रिसमस, गणपती किंवा छट पूजा अशे वेगवेगळे सण व उत्सवांच्या वेळी तसेच  रोजची पूजा अर्चा असो किंवा अजान, लग्न, जत्रेत हिंदू, ख्रिश्चन अशा अन्य धर्मियांमध्येही मोठ्या प्रमाणात लाऊडस्पीकरचा वापर होतो. सर्वच धर्मांत कुठल्या ना कुठल्या स्वरूपात लाऊडस्पीकर वापरला जातो. त्यामुळेच हा मुद्दा राजकीयही बनतो. अजान बंद केलं तर गणपतीतला लाऊडस्पीकरही बंद करावा लागेल, हे राजकारण्यांना माहिती आहे. पण कोणालाही लाऊडस्पीकरचा वापर थांबवायचा नाही, त्यामुळे ते एकाला बोललं की दुसऱ्याकडे बोट दाखवतात. लाऊडस्पीकर्सचा वापर बंद करण्याविषयी हिंदू आणि मुस्लिमांमध्ये पहले आप, पहले आप सुरू आहे. लाऊडस्पीकरच्या वापराचे नियम आणि निर्बंध समान आहेत असं कायदेतज्ज्ञ सांगतात. ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण कायद्यात सांगितलेले नियम मशीद आणि इतर धार्मिक स्थळांनाही लागू होतात. ध्वनिप्रदूषण हा आरोग्याचा प्रश्न आहे, नागरी सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. जेंव्हा लोकच त्याविषयी बोलतात, तेव्हा बदल होऊ शकतो. अनेक गणपती मंडळं, ईद-ए-मिलादला काही आयोजनं करणारे अनेक जण आता स्वतःहून लाऊडस्पीकरचा वापर कमी करत असल्याचं दिसू लागलं आहे. त्याउलट राजकारणीच आता लोकांना लाऊडस्पीकर लावावाच लागेल अशी भाषा करू लागले आहेत. लाऊडस्पीकरवर बंदी घातल्याने संविधानाच्या अनुच्छेद २५ नुसार धार्मिक स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होत नाही. कोणताही धर्म कायद्यापेक्षा मोठा नाही असं न्यायालयानेच म्हटलेले आहे. असो, धार्मिक मुद्द्यांऐवजी राजकारण्यांनी राज्याच्या गरजा काय, कुठले क्षेत्र कमकुवत आहे, तसेच वाढती बेरोजगारी, औद्योगिक क्षेत्राचे थांबलेले चक्र, शिक्षण क्षेत्राची परवड, वाढती महागाई, प्रभावित व्यापारी क्षेत्र, लघुउद्योगांसंबंधीचे धोरण, बुडत्या सहकारी बँका, रस्त्यांची दुरवस्था, वैद्यकीय सोयीसुविधा या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.

  -सुरेश मंत्री.

 

-       


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी, गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र

            मित्रा निस्वार्थ प्रेमाचा तुझा सहवास हवा              मैत्रीच्या नात्यात विश्वास निर्माण करू नवा कवितील या ओळींप्रमाणे वयाच्या १६-१७ व्या वर्षी पूढील शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर झालेले वर्गमित्र, मैत्रिणी आणि त्यांचे गुरुजन २३ वर्षानंतर पुन्हा एकत्र आले. निमित्त होते तालुक्यातील सोमनाथ बोरगाव येथील श्री दत्त माध्यमिक विद्यालयील शैक्षणिक वर्ष २००१-२००२ च्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याचे.  आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा जशी माऊली बाळा....! शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलानंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखवणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या आठवणी आपण कधीच विसरू शकत नाही हे सत्य आहे. जुन्या आठवणींची पाने चाळताना मोरपीस हातात पडते, मोरपीस गालावर फिरवताना आठवणींशी नातं जडते. या आठवणीत बुडून जाताना नाही आजचे राहत भान. क्षण आता ते परत न येतील, तीच होती सुखाची खाण. या विचारांप्रमाणे या विद्यार्थ्यांनी ७-८ महिन्यापूर्वी सोशल मीडियाद्वारे एक...

फाशीचा फास : न्यायव्यवस्थेचा कठोर पण आवश्यक संदेश

   "न्याय उशिरा मिळाला तरी चालेल; पण तो निःपक्ष, कठोर आणि समाजाचा विश्वास वाढवणारा असला पाहिजे." नरसापूर येथील अवघ्या साडेतीन वर्षांच्या निष्पाप बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल केवळ एका खटल्याचा शेवट नाही; तर भारतीय न्यायव्यवस्थेने समाजाला दिलेला एक ठाम आणि स्पष्ट संदेश आहे—बालकांवरील अत्याचार आणि अमानुष गुन्हे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. साडेतीन वर्षांची चिमुकली... जगाचे काहीच भान नसलेले एक निरागस फूल. तिच्या डोळ्यांत भविष्याची असंख्य स्वप्ने होती; पण एका विकृत मानसिकतेने त्या स्वप्नांचा कायमचा अंत केला. अशा वेळी संपूर्ण समाज हादरून जातो. पालकांच्या मनात भीती निर्माण होते. अशा गुन्ह्यांनंतर न्यायव्यवस्थेकडून केवळ निर्णय नव्हे, तर ठोस आणि प्रभावी न्यायाची अपेक्षा असते. भारतीय न्यायव्यवस्था मृत्युदंडाचा वापर अत्यंत मर्यादित परिस्थितीत करते. सर्वोच्च न्यायालयाने "दुर्मिळातील दुर्मिळ" या तत्त्वानुसारच फाशीची शिक्षा देण्याचे निकष निश्चित केले आहेत. नरसापूर प्...

प्रतिभावान अभिनेता : अक्षय खन्ना

  बॉलिवूडमध्ये अनेक कलाकारांनी आपापली स्वतंत्र छाप निर्माण केली, पण अक्षय खन्ना याचे स्थान त्यात विशेष आहे. सहजसुंदर अभिनय, डोळ्यांमधून भावना व्यक्त करण्याची ताकद आणि भूमिकेबद्दलची प्रामाणिकता यामुळे अक्षय खन्ना आज भारतीय चित्रपटसृष्टीतील एक उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित कलाकार मानला जातो. त्याने अनेक सिनेमात काम केलं, अनेक सिनेमात खलनायकाचे रोल केले पण त्याला तितकंच यश मिळालं नाही. आता वयाच्या ५० व्या वर्षी अक्षय खन्ना त्याच्या अभिनयासाठी पुन्हा चर्चेत आला आहे. नव्या कलाकारांना मागे टाकून अक्षय खन्नाने त्याची नवी ओळख निर्माण केली आहे. या वर्षाच्या सुरूवातीला आलेल्या छावा मध्ये क्रूरकर्मा औरंगजेबची भूमिका साकारल्यानंतर, अक्षयने आता पुन्हा एकदा खलनायकी भूमिका केली असून त्याचा धुरंधर मधील ‘रहमान डकैत’ प्रत्येकाच्या तोंडी आहे. लीड भूमिकेतल्या रणवीर पेक्षाही सध्या सगळीकडे अक्षय खन्ना बद्दल बोललं जात आहे.  या चित्रपटातील त्याचा बलूची डान्स असो किंवा त्याचा अंदाज, स्वॅग, तोच चर्चेत आहे. त्याने ‘रहमान डकैत’ या व्यक्तिरेखेशी अशा प्रकारे जुळवून घेतले आहे की जणू तो खलनायक नसून आंतरराष्ट्रीय ...