मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

राष्ट्रीय प्रश्नांपासून पाठ फिरवणारे प्रादेशिक पक्ष

मागिल काही दिवसात दिल्ली आणि काही अन्य विधानसभा निवडणूकांचे निकाल जर बघितले तर हे प्रश्न निर्माण होतात की,काँग्रेसचे स्थान प्रादेशिक पक्षांनी घेतले आहे?भाजपाचा सामना करण्यासाठी प्रादेशिक पक्ष अधिक सक्षम आहेत का आणि त्यांना निवडणूकीच्या मुद्दयांची अधिक चांगली माहिती आहे?लोकांनी आता काँग्रेसची साथ सोडली आहे?गांधी परिवाराची जादू आता संपली आहे?काँग्रेसने कधीच प्रादेशिक पक्षांना किंमत दिली नाही.एक काळ असा होता ज्यावेळी काँग्रेसला संपूर्ण देशात मोठा जनाधार होता.आता याच काँग्रेसला प्रादेशिक पक्षांचा आधार घ्यावा लागत आहे.काँग्रेसचे स्थान आता भाजपाने घेतले आहे का?नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणूकीच्या सुरूवातीलाच काँग्रेसने जणू आपला पराभव स्विकारला होता.तिला तिथे सलग दूस-यांदा एकही जागा जिंकता आली नाही.भाजपाने मात्र शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले.भाजपा कुठे जिंकत आहे तर कुठे तिला मोठया पराभवाला सामोरे जावे लागत आहे.मात्र ती देशातील अधिकाधिक राज्यात लढताना दिसत आहे.भारतीय राजकारणात झालेला हा खूप मोठा बदल आहे. राजकारणाच्या रणांगणात अनेक रथी-महारथी आले आहेत,जे रस्त्यावर येवून लोकांसाठ...

जीवनशैली बदलण्याची गरज

    उ र्जेचा काटकसरीने उपयोग करण्यासाठी आयोजित अनेक आतंरराष्ट्रीय परिसंवाद फक्त औपचारिकता म्हणून आयोजित केले जातात. जगातील कोणताही असा देश नाही जो आपल्या वाट्याचा विकास थांबवु ईच्छित नाही. कोणीही कार्बन उत्सर्जनावर अंकुश लावू ईच्छित नाही. आजही जगातील सर्वात मोठा उर्जेचा स्त्रोत औष्णिक उर्जा हाच आहे. कमीत-कमी पूढील दोन-तीन दशक तरी आपण कोळशाला पर्याय शोधु शकणार नाही. यामुळेच आपण आतापर्यंत पॅरीस अथवा क्योटा मध्ये घेण्यात आलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करू शकलो नाहीत.                       आज जगात एकुण उर्जेच्या ४२ टक्के उर्जा कोळशापासुन मिळवली जाते. खरंतर जगात मागील काही वर्षात कोळशाच्या वापरात कमी आली आहे. जागतीक आकडेवारीनुसार २०१० मध्ये कोळशावर झालेला खर्च १३४ अरब डॉलर होता तर २०१८ मध्ये ८० अरब डॉलरचा खर्च झाला. भारतात मात्र हे चित्र बदलले नाही. भारतात २०१० मध्ये कोळशावर झालेला खर्च ६ अरब डॉलर तर २०१८ मध्ये तो वाढुन ८ अरब डॉलर झाला. चीनने मात्र याबबतीत खूप तत्परता दाखवली आहे. तिथे २०१० मध्ये कोळशावर ५० अरब डॉलर...

अर्थसंकल्पापूढील आव्हाने

अर्थमंत्री निर्मला सीतारमण  मोदी सरकारची दुस-यांदा सत्ता स्थापन झाल्यानंतरचा दुसरा अर्थसंकल्प लोकसभेत उद्या सादर करणार आहेत.या अर्थसंकल्पाकडे अर्थातच संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.सार्वत्रिक लोकसभा निवडणूकीत मोठा विजय मिळवून परत सत्तेत आलेल्या मोदी सरकारसाठी आज पर्यंतचा सर्वात कठिण आणि आव्हानात्मक असा अर्थसंकल्प म्हणून याकडे पाहिले जात आहे.मोदी सरकार अशा वेळी अर्थसंकल्प सादर करणार आहे जेंव्हा देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदीकडे असल्याच्या चर्चेने जोर पकडला आहे.सर्व आकडेवारीही याकडेच संकेत करित आहे.अशात मोदी सरकारपूढे कोटयावधी भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आव्हान आहेच सोबत ढासळत चाललेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला पुन्हा उभारी देण्याची जबाबदारी सुद्धा. सध्या उत्पादनापासून मागणीपर्यंत मागील दोन दशकातील सर्वात सुस्तीचा काळ आहे.काही जाणकार सध्याच्या अवस्थेला नव्वदच्या दशकातील मंदीशी जोडत आहेत.तसतर सरकारने या मंदीला अल्पकालीन म्हटले होते मात्र ही गोष्ट खरी ठरली नाही आणि परिस्थिती दिवसेंदिवस खराबच होत गेली.अशा कठिण परिस्थितीत विविध सर्व्हेक्षणातुन आलेल्या आकडेवारीने एनडीए सरका...

चंद्र आहे साक्षीला

सुमारे ५० वर्षांपूर्वी मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते.तो दिवस होता २१ जुलै १९६९.नील आर्मस्ट्रांग याने चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर म्हटले होते ‘एका मानवाचे हे छोटेसे पाऊल मानतेसाठीची एक उंच उडी आहे.’अपोलोमिशन अंतर्गत १९६९ ते ११९७२ एकूण नऊ यान चंद्राकडे पाठविले गेले आणि सहा वेळा मानवाला चंद्रावर उतरविले गेले.अपोलो मिशन संपल्यानंतर तीन दशकांपर्यंत चंद्र मोहिमेबाबतीत एक प्रकारचा निरूत्साह जगात दिसून आला.मात्र आता चंद्राचे आकर्षण परत वाढत आहे.मागिल वर्ष चंद्र मोहिमांबाबतीत खूप विशेष राहिले.जानेवारी २०१९ मध्ये चीनी अंतराळयान चांग ई-४ ने एका छोटया स्वयंचलित रोवर सोबत चंद्रावर उतरून इतिहास रचला.दूसरीकडे मागिल वर्षातच भारताने आपल्या महत्वाकांक्षी चंद्र मोहिमेअंतर्गत चंद्रयान-२ ला चंद्राकडे पाठविले मात्र यात अपेक्षित यश मिळाले नाही.मागिल वर्षात ईस्त्राईलने सुद्धा एक छोटा लैंडर त्याच्याकडे पाठवला होता मात्र तोही दुर्घटनाग्रस्त झाला होता. आता परत अमेरिकेने आपले लक्ष चंद्राकडे केंद्रीत केले आहे.२०२३-२४ पर्यंत चंद्रावर मानवाला पाठवण्याच्या मिशनला घेवून अमेरिकेने कामाला वेग दिला आहे.अंतरा...

१८ वर्षापर्यंतच्या मुलांना मिळावे मोफत आणि सक्तीचे शिक्षण

बाल मजुरी विरोधात काम करणारे कैलाश सत्यार्थी यांच्या बाल संस्थेमार्फत दिल्ली मध्ये आयोजित शिक्षणाच्या राष्ट्रीय संमेलनात कधी काळी खाणीत बाल मजुरी करणारी ब्रिटनच्या प्रतिष्ठित डायना पुरस्काराने सन्मानित १३ वर्षांची चंपा बोलत होती.ती आता ८ वी मध्ये शिकते.चंपाने सांगितले की,‘मलाही शाळा सोडावी लागली होती,कारण शिक्षण ही माझ्या कुटुंबाची प्राथमिकता नव्हती.मी माझ्या गावातील खाणीत काम करायचे.बाल मजुरीच्या दलदलीतून मुक्त करून मला एका सरकारी शाळेत प्रवेश दिला गेला.ज्यामुळे मी आज ईथे आहे.माझे हे मानने आहे की शिक्षण हे एकमेव हत्यार आहे जे माझ्यासारख्या बाल मजुरांची रक्षा करण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावू शकते.त्यामुळे माझी ईच्छा आहे की,सर्व मुले शाळेत शिकावित.’या संमेलनात अनेक खासदार,अधिकारी,न्यायाधिश,पोलिस अधिकारी आणि बाल अधिकार कार्यकर्ते उपस्थित होते.चंपा आता राष्ट्रीय बाल पंचायतची उपाध्यक्ष आहे.छोटया चंपाने आपल्या अनुभवातुन जी गोष्ट समोर ठेवली तिचा खोल नीतितार्थ आहे. या नीतितार्थला समजण्यापूर्वी जरा ही आकडेवारी पाहू या.भारत सरकारच्या मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाच्या एका अहवालानुसार देशात...

सामुहिक आत्महत्येच्या दिशेने

मागिल काही काळात लोकप्रिय झालेल्या चित्रपट मालिका अवेंजर्सचा खलनायक थैनोस विश्वाला वाचवण्यासाठी पृथ्वीवरिल अर्ध्या मानव जातीला नष्ट करतो.थैनोस असे मानतो की,मानवाने पर्यावरण आणि संसाधनांचा नाश करून संपुर्ण विश्वाला धोका निर्माण केला आहे त्यामुळे मानव जातीला समुळ नष्ट केले पाहिजे.या चित्रपटाचे नायक थैनोस विरुद्ध महायुद्ध लढतात आणि शेवटी यशस्वी होतात.मात्र वास्तवात जे होत आहे ते याच्या एकदम उलट आहे.कोण्या थैनोसला आपल्याला नष्ट करण्यासाठी कष्ट करण्याची गरजच नाही कारण या पृथ्वीवर राहणा‌-या आपण मानवांनी अगोदरच सामुहिक आत्महत्येच्या दिशेने पाऊल टाकलेले आहे.एवढच नाही तर आपण चार अरब वयस्क,तीन अरब बालक आणि युवकांना सुद्धा मृत्युच्या दाढेकडे ओढत नेत आहोत जे या पापात कधीच भागिदार नव्हते. पर्यावरणाच्या अभ्यासातुन येणा-या जवळपास सर्व संशोधनांतुन असे दिसते की,धोक्याची घंटा सगळीकडुन वाजत आहे आणि आता सर्वांना याचा अंदाज आला आहे की,मानवाच्या स्वार्थ आणि अत्याचारामुळे पृथ्वीची सहनशक्ती आता संपली आहे.जीवनावश्यक हवा आणि पाणी विषारी होत आहे.भुगर्भातील खनिज संपत्तीचे साठे संपत चालले आहेत.जागतीक तापमानात ...

जीवनाचा खरा आनंद महिलांकडुन शिका

नुकतेच एक संशोधन आले आहे.जे पुरूष महिलांच्या सान्निध्यात राहतात त्यांच्यामधे तणाव आणि नैराश्य कमी निर्माण होते.एवढेच नाही तर ज्या महिला महिलांच्या सान्निध्यात अधिक राहतात त्यांची सुद्धा तणाव आणि नैराश्यासंबंधीची तक्रार कमी असते.याचा अर्थ महिलांच्या सान्निध्यात राहिल्याने तुम्ही स्वत:ला अनेक आजारांपासून वाचवू शकता.असा बिलकुल विचार करू नका की हा केवळ विचार आहे.हे एक वैज्ञानिक सत्य आहे. गोष्ट ही आहे की,पुरूषांचा मेंदु चौकोनी असतो.जो अनेक खान्यात विभागलेला असतो.एकात काम,दुस-यात आराम,तिस-यात प्रसिद्धी आणि चौथ्यात पैसा.मी इथं चार खाने लिहीली आहेत याचा अर्थ असा नाही की केवळ ही चार खानी असतात.असु शकत,शंभर खाने असतील.पुरूष वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या गोष्टींवर विचार करू शकतात.महिलांचा मेंदु मात्र गोलाकार असतो.थांबा,अस मी म्हणताच आपण मेंदुचा एक्स रे घेवून बसु नका की पाहु कुठे चौकोनी असतो आणि कुठे गोल?भौतीक स्वरूपात महिला आणि पुरूषांचा मेंदु एकसारखाच असतो मात्र महिलांचा मेंदु मी यासाठी गोल म्हणतोय कारण त्यांच्या मेंदुत वेगवेगळया खान्यांच्या सीमा असत नाहीत.एक महिला स्वयंपाक करता-करता मुलांचा गृ...