एक
चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. 'द केरळा स्टोरी' असं या चित्रपटाचं नावं आहे. 'द केरळा स्टोरी’ या चित्रपटाची कथा
सत्य घटनेवर आधारित आहे. या
चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय. 'द केरळा स्टोरी' हा चित्रपट केरळ राज्यातील अतिशय गंभीर विषयावर बेतला आहे. केरळ राज्यातून
तरुण मुली, महिला बेपत्ता होण्याच्या घटना आजही घडतच आहेत.
केरळ राज्यातून बेपत्ता झालेल्या ३२,००० मुली आणि महिलांचं
नेमकं काय झालं, त्या कुठं गेल्या यामागचं सत्य या
चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे. ५ मे रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित
होणार आहे.
काही
मीडिया रिपोर्ट्सनुसार, २००९ मध्ये केरळ आणि मँगलोरमधून सुमारे ३२ हजार हिंदू आणि ख्रिश्चन
मुलींचं अपहरण करण्यात आलं होतं. या मुली लव्ह जिहाद’ला बळी पडल्या. त्यांना बळजबरीने इस्लाम धर्म स्वीकारायला लावलं
होतं. त्यांच्यापैकी बहुतांश मुलींना नंतर सीरिया, अफगाणिस्तान आणि इतर भागात पाठवलं गेलंय. या
मुली पुन्हा घरी परतल्याच नाहीत, असं सांगण्यात येतं. केरळमध्ये मुलींची कशी फसवणूक केली
जाते, कसं त्यांचं ब्रेनवॉश
केलं जातं. हिजाब घालणाऱ्या महिलांवर बलात्कार होत नाही, हे
त्यांना दाखवलं जातं. त्यामुळं या महिला, मुली इस्लाम धर्म
स्वीकारतात. यानंतर त्यांना ISIS च्या आतंकवाद्यांसमोर उभं
केलं जातं. त्यानंतर सुरू होतो, अंगावर काटा आणणारा खेळ.
आतंकवाद्यांचा क्रुर चेहरा दिसतो. असं काहीसं या चित्रपटाच कथानक आहे.
या चित्रपटात एक काल्पनिक कथानक मांडण्यात आलं असलं तरी
केरळमधील एका दुर्दैवी घटनेचं दाहक वास्तव
आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. केरळ, आंध्रप्रदेश मधील चंदन तस्करी बद्दल आपण
ऐकून आहोत मात्र याच केरळ मधून होणा-या मानवी तस्करी बद्दल अद्याप लोकांना फारसं काही
माहीत नव्हत आणि यावर कोणत्याही चित्रपट निर्मात्याने चित्रपट बनवलेलाही नव्हता. द
केरळा स्टोरी या चित्रपटाची निर्मिती
विपुल शाह यांनी केली असून सुदिप्तो सेन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. विपुल
शाह यांनी याअगोदर ‘ह्युमन’ नावाच्या एका संवेदनशिल वेबसिरीजची निर्मिती केली होती. या
चित्रपटासाठी त्यांनी चार वर्षे संशोधन आणि अभ्यास केला आहे. केरळ मधील मुलींच्या
संघर्षाची ही गाथा बघून नक्कीच सर्वांचे डोळे पाणावतील. या चित्रपटाच्या माध्यमातून
प्रेक्षकांना भारतात घडलेल्या अजून एका अन्यायाबद्दल माहिती मिळेल. या चित्रपटात अत्यंत हिंसक आणि हृदयद्रावक दृश्य तसेच काही बोल्ड संवादही
ऐकायला मिळत आहेत. “अल्लाह हा या सृष्टीचा एकमेव कर्ता धर्ता आहे.” किंवा “हिजाब
परिधान केलेल्या एकाही मुलीचा बलात्कार झालेला नाही.” असे संवादही आहेत असे या चित्रपटाच्या ट्रेलर वरून लक्षात येते. अदा
शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी या अभिनेत्री चित्रपटात
मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे.
चित्रपटावर बंदीची मागणी
या चित्रपटामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता पाहता या चित्रपटावर
बंदी घालण्याची मागणी होत आहे. तमिळनाडूतील
एका पत्रकाराने चित्रपटावर बंदी घालण्यासाठी केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळ, केरळचे मुख्यमंत्री कार्यालय आणि माहिती आणि
प्रसारण मंत्रालयाकडे याचिका केली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून केरळची प्रतिमा
मलीन करून तेथे धार्मिक भेदभाव पसरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे अनेकांचे
म्हणणे आहे. द केरळा स्टोरी या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळेल की
नाही ? या
प्रश्नाचं उत्तर लवकरच मिळेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा